शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांमुळे विदयार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 16:43 IST

बालभारतीच्या दहावीच्या अभ्यासक्रमाच्या नवीन पाठयुपस्तकांसोबत उपलब्ध होणा-या भाषा आणि भाषेतर विषयाच्या स्वतंत्र मूल्यमापन पुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे याचा तपशील समजणार आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होणार आहे, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी व्यक्त केला. 

मुंबई : बालभारतीच्या दहावीच्या अभ्यासक्रमाच्या नवीन पाठयुपस्तकांसोबत उपलब्ध होणा-या भाषा आणि भाषेतर विषयाच्या स्वतंत्र मूल्यमापन पुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे याचा तपशील समजणार आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होणार आहे, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी व्यक्त केला. 

केंद्र सरकारने दिलेल्या अध्ययन निष्पत्तीचा समावेश बालभारतीच्या नवीन अभ्यासक्रमांच्या प्रत्येक विषयाच्या पाठयपुस्तकांमध्ये करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्व राज्यांमध्ये पहिले असेल, असे विनोद तावडे यांनी सांगितले.  महाराष्ट्र राज्य पाठ्युपस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळ (बालभारती) निर्मित इयत्ता दहावीच्या सर्व माध्यमांच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठयपुस्तकाचे प्रकाशन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते आज दादर येथे शिवाजी मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आले. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारात उपलब्ध झाली आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने अभ्यासमंडळातील विशेष तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत.  

एसएससी आणि सीबीएसई या दोन्ही मंडळांच्या अभ्यासक्रमांमध्ये जास्त फरक नसतो. सीबीएसई मंडळाच्या तुलनेत एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्येही अधिक वाढ व्हावी यादृष्टीने बालभारतीच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे सीबीएससी आणि आयसीएससीच्या विदयार्थ्यांना एसएससी बोर्डाचे विद्यार्थी सामना करु शकतील असा विश्वासही असेही तावडे यांनी व्यक्त केला. नवीन अभ्यासक्रमाच्या प्रत्येक पुस्तकातील धडयांमध्ये क्यूआर कोडचा समावेश करण्यात आला असून या डिजिटल पध्दतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक व सविस्तर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांबरोबर प्रत्येक विषयाची मूल्यमापन पध्दती कशी असेल याबाबतचा तपशील देणारी हस्तपुस्तिका देण्यात येणार आहे. या पुस्तिकेच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयाची ओळख, विषययोजना,कृतीपत्रिका, प्रश्नपत्रिका याचे स्वरुप व निर्मितीचे निकष आणि  याआधारे विद्यार्थ्यांना मूल्यामापन कसे करावे याचा तपशील समजणार आहे, असेही तावडे यांनी सांगितले. नव्या अभ्यासक्रमात शब्दसंपत्तीचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्वअध्ययन, चिकित्सक वृत्ती, निरीक्षण, निर्णयक्षमता, जबाबदार नागरिकत्वाचेभान, उद्योग-व्यवसायाशी निगडित शिक्षणावर भर देण्यात आल्याचेही तावडे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी अभ्यासक्रमाच्या अभ्यासमंडळाचे विषय तज्ञ यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभ्यासमंडळाच्या सर्व विषय तज्ञांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचे तसेच बालभारतीने वेळेचे नियोजन करीत दहीवीच्या सर्व माध्यमांची नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके वेळेत बाजारात उपलब्ध करुन दिल्याबद्दल तावडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या प्रसंगी तावडे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. याप्रसंगी बालभारतीचे सुनिल मगर, विवेक गोसावी तसेच अभ्यासमंडळातील सर्व विषय तज्ञ उपस्थित होते. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेStudentविद्यार्थीSchoolशाळा