शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांमुळे विदयार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 16:43 IST

बालभारतीच्या दहावीच्या अभ्यासक्रमाच्या नवीन पाठयुपस्तकांसोबत उपलब्ध होणा-या भाषा आणि भाषेतर विषयाच्या स्वतंत्र मूल्यमापन पुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे याचा तपशील समजणार आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होणार आहे, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी व्यक्त केला. 

मुंबई : बालभारतीच्या दहावीच्या अभ्यासक्रमाच्या नवीन पाठयुपस्तकांसोबत उपलब्ध होणा-या भाषा आणि भाषेतर विषयाच्या स्वतंत्र मूल्यमापन पुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे याचा तपशील समजणार आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होणार आहे, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी व्यक्त केला. 

केंद्र सरकारने दिलेल्या अध्ययन निष्पत्तीचा समावेश बालभारतीच्या नवीन अभ्यासक्रमांच्या प्रत्येक विषयाच्या पाठयपुस्तकांमध्ये करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्व राज्यांमध्ये पहिले असेल, असे विनोद तावडे यांनी सांगितले.  महाराष्ट्र राज्य पाठ्युपस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळ (बालभारती) निर्मित इयत्ता दहावीच्या सर्व माध्यमांच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठयपुस्तकाचे प्रकाशन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते आज दादर येथे शिवाजी मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आले. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारात उपलब्ध झाली आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने अभ्यासमंडळातील विशेष तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत.  

एसएससी आणि सीबीएसई या दोन्ही मंडळांच्या अभ्यासक्रमांमध्ये जास्त फरक नसतो. सीबीएसई मंडळाच्या तुलनेत एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्येही अधिक वाढ व्हावी यादृष्टीने बालभारतीच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे सीबीएससी आणि आयसीएससीच्या विदयार्थ्यांना एसएससी बोर्डाचे विद्यार्थी सामना करु शकतील असा विश्वासही असेही तावडे यांनी व्यक्त केला. नवीन अभ्यासक्रमाच्या प्रत्येक पुस्तकातील धडयांमध्ये क्यूआर कोडचा समावेश करण्यात आला असून या डिजिटल पध्दतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक व सविस्तर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांबरोबर प्रत्येक विषयाची मूल्यमापन पध्दती कशी असेल याबाबतचा तपशील देणारी हस्तपुस्तिका देण्यात येणार आहे. या पुस्तिकेच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयाची ओळख, विषययोजना,कृतीपत्रिका, प्रश्नपत्रिका याचे स्वरुप व निर्मितीचे निकष आणि  याआधारे विद्यार्थ्यांना मूल्यामापन कसे करावे याचा तपशील समजणार आहे, असेही तावडे यांनी सांगितले. नव्या अभ्यासक्रमात शब्दसंपत्तीचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्वअध्ययन, चिकित्सक वृत्ती, निरीक्षण, निर्णयक्षमता, जबाबदार नागरिकत्वाचेभान, उद्योग-व्यवसायाशी निगडित शिक्षणावर भर देण्यात आल्याचेही तावडे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी अभ्यासक्रमाच्या अभ्यासमंडळाचे विषय तज्ञ यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभ्यासमंडळाच्या सर्व विषय तज्ञांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचे तसेच बालभारतीने वेळेचे नियोजन करीत दहीवीच्या सर्व माध्यमांची नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके वेळेत बाजारात उपलब्ध करुन दिल्याबद्दल तावडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या प्रसंगी तावडे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. याप्रसंगी बालभारतीचे सुनिल मगर, विवेक गोसावी तसेच अभ्यासमंडळातील सर्व विषय तज्ञ उपस्थित होते. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेStudentविद्यार्थीSchoolशाळा