शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

‘नीट’चे परीक्षा केंद्र प्रत्येक जिल्हा मुख्यालयी असावे

By admin | Published: January 08, 2017 8:59 PM

राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेचे केंद्र प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी असावे

ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 8 : राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेचे (नीट) केंद्र प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी असावे, अशा मागणीचे निवेदन राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. जिल्हा मुख्यालयी परीक्षा केंद्र दिल्यानंतर विद्यार्थ्यांना सहज व सुलभतेने परीक्षा केंद्रावर पोहचता येईल, असेही खा. चव्हाण यांनी केंद्रीय मानव विकास व संशोधन मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. नीट परीक्षेचे आॅनलाईन अर्ज जानेवारी महिन्यात भरले जाणार आहेत. तत्पूर्वी नवीन परीक्षा केंद्रांची निर्मिती करुन राज्यातील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.

राज्यभरातील लाखो विद्यार्थी दरवर्षी एमबीबीएस, बीडीएस व तत्सम वैद्यकीय शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश पात्रता परीक्षेला बसतात. ही परीक्षा यापूर्वी राज्यपातळीवर होत होती. या परीक्षेचे केंद्र जिल्ह्याचे मुख्यालय होते. त्या ठिकाणच्या विविध शाळा, महाविद्यालयात परीक्षा घेतल्या जात होत्या. परंतु या वर्षी पहिल्यांदाच एचएच.सीईटी ऐवजी नीट म्हणजेच राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद व कोल्हापूर हे सहा परीक्षा केंद्र निश्चित केले आहेत.

परिणामी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी निश्चित स्थळी पोहचण्यास वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करुन सुमारे तीन ते चारशे किलोमीटरचे अंतर पार पाडावे लागणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या वेळेचा अपव्यय होवून मानसिक व शारीरिक त्रास होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या सहा केंद्रा व्यतिरिक्त प्रत्येक जिल्हा मुख्यालयी किंवा शक्य नसेल तर दोन किंवा तीन जिल्हा मुख्यालय एकत्र करुन परीक्षा केंद्र देण्यात यावे, अशी मागणीही खा. चव्हाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)