शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

टोळधाड रोखण्यासाठी सुदृढ संशोधनाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 5:04 AM

महाराष्ट्रात टोळ प्रजनन होणार नाही : कृषी शास्त्रज्ञ डॉ. गोविंद गुजर यांची माहिती

विकास झाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात ‘टोळ’ चे संकट आले असले तरी महाराष्ट्रातील शेतजमीन टोळीला प्रजननासाठी पूरक नसल्याने महाराष्ट्रावरील हे संकट कायमचे नाही आणि लवकरच नाहीसे होईल, अशी माहिती दिल्लीच्या भारतीय कृषी अन्वेषण संस्थेतील कीडशास्त्र विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. गोविंद गुजर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

डॉ. गुजर म्हणाले, महाराष्ट्रातील माती ही अधिक चिकट आहे. अलीकडच्या दिवसात ती कोरडी आणि उष्णही आहे. त्यामुळे टोळ अशा मातीत अंडी देऊ शकत नाही. अंडी दिली तरी त्यातून टोळीचे प्रजनन होणार नाही. टोळीचे सामान्य आयुष्यमान २ ते ३ महिने आहे, त्यामुळे महाराष्ट्रावरचे संकट कमी होईल. असे असले तरी आता टोळीने केलेला हल्लाबोल थांबविण्यासाठी शास्त्रोक्त प्रयोग करणे गरजेचे आहे. त्यासाठी भारत सरकारने किडांशी अनुमोदीत कीडनाशकांचा उपयोग करताना तत्परता आणि दक्षतेची आवश्यकता आहे.

महाराष्ट्रात टोळ थोपवून धरण्यासाठी गवत जाळणे, फटाके फोडणे असे प्रयोग केले जात आहेत. मात्र, ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. त्याचा टोळीवर विशेष परिणाम होणार नाही. त्यापेक्षा निंबोळीच्या अर्कच्या फवारणीचा अधिक चांगला परिणाम होतो. कोरोनानंतर ‘टोळ’चे संकट हे देशासाठी आव्हान ठरले आहे. टोळधाडीस रोखण्यासाठी सुदृढ संशोधनाची गरज आहे. टोळधाडीवरील नियंत्रण आणि व्यवस्थापनावर खंत व्यक्त करताना डॉ.गुजर म्हणाले, टोळीने पाकिस्तान-भारत सीमेवर धाड टाकून दीड महिना होत आहे. राजस्थानच नव्हे तर पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातील पिके उद्ध्वस्त होत आहेत. महाराष्ट्रात मे महिन्याच्या शेवटच्या आठवाड्यात अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात टोळीने शेतीमालाचे नुकसान केले आहे. भारत सरकारच्या कृषी विभागाने पाकिस्तान-भारत सीमेवरील राज्यात दहा ‘टोळ सचेतना’केंद्रे उभारली आहेत.देशात कोठून आले टोळ?या टोळीचे प्रजनन आफ्रिकेच्या सोमालिया, इथोपिया, केनिया, दक्षिण सुदान, युगांडा, अरब प्रयाद्वीप, पेनिन्सुलाच्या यमन, ओमान आणि सौदी अरेबिया व दक्षिण पश्चिम आशियाच्या इराण आणि पाकिस्तानात जुलै ते आॅक्टोबर महिन्यात होते. भारतात ही टोळ आफ्रिका, अरब पेनिन्सुला आणि इराण, पाकिस्तानमार्गे आली आहे.100 हेक्टर परिसरात ८ कोटींपेक्षा अधिक टोळ असू शकतात व वाऱ्याच्या दिशेनुसार प्रत्येक दिवशी १५० कि.मी. उडू शकतात.2018 पासून अरबी समुद्रात येणाºया वादळाच्या (भारतीय निनो) प्रभावाने आफ्रिकेत पडणाºया पावसाने टोळ प्रजननासाठी उत्तम हवामान निर्माण झाले.हवामान बदलाचा हा परिणाम आहे. टोळ कोणत्याही पिकास नष्ट करते. संत्रा, पपई, आंबे, वांग्याची पाने खातात. टोळ लाखोंच्या संख्येने असल्याने पिकांचे खूप नुकसान होते. लगेच वाºयाच्या दिशेनुसार ते दुसरीकडील पिके शोधतात.

टॅग्स :Farmerशेतकरी