शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी फलोत्पादन संस्था स्थापण्याची गरज - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 14:37 IST

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शुगर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर फलोत्पादन संशोधन संस्था व कृषीउत्पादन विपणन संघ स्थापण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

 नाशिक - शेतकरी एकत्र येत आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत कृषी उत्पादन वाढवत आहे. कृषी उत्पादक विपणन कंपन्यांचे माध्यमातून कृषी मालाची विक्रीही वाढत आहे, मात्र हे करत असताना सर्वांनाच विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, या समस्या सोडविण्यासाठी शुगर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर फलोत्पादन संशोधन संस्था व कृषीउत्पादन विपणन संघ स्थापण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे शेतक-यांनी स्थापन केलेल्या कृषी माल आणि प्रक्रि या कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी शेतक-यांच्या समस्या जाणून त्यांना मार्गदर्शन केले.  पवारांना असलेल्या आधुनिक शेतीच्या अद्ययावत ज्ञानाबद्दल येथील तज्ज्ञ आणि शेतकरीही अवाक झाले.कादवाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते श्रीराम शेटे,आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह शेतकरी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. पवार यांनी दौर्यात सह्याद्री फार्म येथे शेतकर्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत समस्या जाणून घेत मार्गदर्शन केले. वाघाड पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून वाघाड लाभक्षेत्रातील शेतक-यांनी वाघाड धरणातील पाण्याचे स्वयंस्फूर्तीने व्यवस्थापन करून आणि आधुनिक शेतीची कास धरल्याने हा परिसर आता सुजलाम सुफलाम बनला आहे.तर सह्याद्री फार्मच्या माध्यमातून येथील शेतक-यांनी कुठल्याही दलाल आणि व्यापा-यांशिवाय स्वत:च शेतमालाचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग सुरू केले असून देशातील इतर शेतक-यांसाठी शेतीचे हे स्वयंपूर्ण मॉडेल आदर्शवत ठरत आहेत. याची पाहणी शरद पवार यांनी करत येथील शेतकर्यांच्या संघिटत प्रयत्नांचे कौतुक केले. सह्याद्री फार्म वर अद्याक्ष विलास शिंदे यांनी स्वागत करत उपक्रमाची माहिती दिली. शरद पवार यांनी शेतक-यांच्या समस्या जाणून घेत अगदी तंत्रशुद्ध माहिती देत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी सरकारवर कोणतीही राजकीय टिकाटिपण्णी न करता शेतक-यांनी संघटित येत करायची वाटचाल यावर भाष्य केले.

टॅग्स :FarmerशेतकरीSharad Pawarशरद पवारIndiaभारतagricultureशेती