शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

राज्यातील तब्बल ८५ लाख शेतकरी दुष्काळाच्या फेऱ्यात, मराठवाड्याला सर्वाधिक झळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 05:24 IST

पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे ८० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ८५ लाखांहून अधिक शेतकºयांना त्याची झळ पोहोचणार असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला दिला आहे.

पुणे - पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे ८० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ८५ लाखांहून अधिक शेतकºयांना त्याची झळ पोहोचणार असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला दिला आहे. या शेतक-यांचे साडेसात हजार कोटींचे नुकसान झाले आहे. मराठवाड्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसली आहे.प्रत्येक जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्रतेची पाहणी करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. हाती आलेल्या माहितीनुसार सोयाबीन, कापूस, तूर, भात या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तर, मराठवाड्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात ऊस वगळून १४० आणि ऊसासह क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर क्षेत्र आहेत. त्या पैकी ऊस पिक वगळून १३९.३८ व ऊस पिकासह १४१.२९ लाख हेक्टरवरील पेरणी आणि लागवड झाली आहे. त्यातील ऊस वगळून ८० ते ८५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात कापूस, उशीरा पेरलेला सोयाबीन, तूर, ज्वारी आणि भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापसाचे ४२.५८ लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यातील अंदाजे २० लाख हेक्टरला फटका बसला आहे. तर, तूरीचा १२ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे. तूरीच्या उत्पादनात निम्म्याने घट होईल असा अंदाज आहे.२ हेक्टर खालील क्षेत्र असलेल्या शेतकºयांचे तब्बल ५ हजार ३०० कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज आहे. तर, २ हेक्टरवरील क्षेत्र असलेल्या शेतकºयांना २ हजार २०० कोटींचा फटका बसल्याचे अहवालात म्हटले आहे. यात फळबागांचे १८३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.५ जिल्ह्यांत तीव्र दुष्काळमराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी वगळून इतर भागाला मोठा फटका बसला आहे.चा-याच्याही दुष्काळाची शक्यताराज्यात डिसेंबरनंतर चा-याची तीव्र टंचाई होण्याची भीती कृषी अधिकाºयांनी वर्तवली. त्यामुळे पशुधन जगविण्यासाठी सरकारला मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून चारा आणावा लागेल. मराठवाड्यात चाºयाचा प्रश्न अधिक तीव्र असेल. विदर्र्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये चारा छावण्यांचे नियोजन करावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र