शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

राज्यातील तब्बल ८५ लाख शेतकरी दुष्काळाच्या फेऱ्यात, मराठवाड्याला सर्वाधिक झळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 05:24 IST

पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे ८० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ८५ लाखांहून अधिक शेतकºयांना त्याची झळ पोहोचणार असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला दिला आहे.

पुणे - पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे ८० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ८५ लाखांहून अधिक शेतकºयांना त्याची झळ पोहोचणार असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला दिला आहे. या शेतक-यांचे साडेसात हजार कोटींचे नुकसान झाले आहे. मराठवाड्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसली आहे.प्रत्येक जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्रतेची पाहणी करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. हाती आलेल्या माहितीनुसार सोयाबीन, कापूस, तूर, भात या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तर, मराठवाड्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात ऊस वगळून १४० आणि ऊसासह क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर क्षेत्र आहेत. त्या पैकी ऊस पिक वगळून १३९.३८ व ऊस पिकासह १४१.२९ लाख हेक्टरवरील पेरणी आणि लागवड झाली आहे. त्यातील ऊस वगळून ८० ते ८५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात कापूस, उशीरा पेरलेला सोयाबीन, तूर, ज्वारी आणि भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापसाचे ४२.५८ लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यातील अंदाजे २० लाख हेक्टरला फटका बसला आहे. तर, तूरीचा १२ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे. तूरीच्या उत्पादनात निम्म्याने घट होईल असा अंदाज आहे.२ हेक्टर खालील क्षेत्र असलेल्या शेतकºयांचे तब्बल ५ हजार ३०० कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज आहे. तर, २ हेक्टरवरील क्षेत्र असलेल्या शेतकºयांना २ हजार २०० कोटींचा फटका बसल्याचे अहवालात म्हटले आहे. यात फळबागांचे १८३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.५ जिल्ह्यांत तीव्र दुष्काळमराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी वगळून इतर भागाला मोठा फटका बसला आहे.चा-याच्याही दुष्काळाची शक्यताराज्यात डिसेंबरनंतर चा-याची तीव्र टंचाई होण्याची भीती कृषी अधिकाºयांनी वर्तवली. त्यामुळे पशुधन जगविण्यासाठी सरकारला मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून चारा आणावा लागेल. मराठवाड्यात चाºयाचा प्रश्न अधिक तीव्र असेल. विदर्र्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये चारा छावण्यांचे नियोजन करावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र