शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

राज्यातील तब्बल ८५ लाख शेतकरी दुष्काळाच्या फेऱ्यात, मराठवाड्याला सर्वाधिक झळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 05:24 IST

पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे ८० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ८५ लाखांहून अधिक शेतकºयांना त्याची झळ पोहोचणार असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला दिला आहे.

पुणे - पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे ८० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ८५ लाखांहून अधिक शेतकºयांना त्याची झळ पोहोचणार असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला दिला आहे. या शेतक-यांचे साडेसात हजार कोटींचे नुकसान झाले आहे. मराठवाड्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसली आहे.प्रत्येक जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्रतेची पाहणी करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. हाती आलेल्या माहितीनुसार सोयाबीन, कापूस, तूर, भात या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तर, मराठवाड्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात ऊस वगळून १४० आणि ऊसासह क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर क्षेत्र आहेत. त्या पैकी ऊस पिक वगळून १३९.३८ व ऊस पिकासह १४१.२९ लाख हेक्टरवरील पेरणी आणि लागवड झाली आहे. त्यातील ऊस वगळून ८० ते ८५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात कापूस, उशीरा पेरलेला सोयाबीन, तूर, ज्वारी आणि भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापसाचे ४२.५८ लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यातील अंदाजे २० लाख हेक्टरला फटका बसला आहे. तर, तूरीचा १२ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे. तूरीच्या उत्पादनात निम्म्याने घट होईल असा अंदाज आहे.२ हेक्टर खालील क्षेत्र असलेल्या शेतकºयांचे तब्बल ५ हजार ३०० कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज आहे. तर, २ हेक्टरवरील क्षेत्र असलेल्या शेतकºयांना २ हजार २०० कोटींचा फटका बसल्याचे अहवालात म्हटले आहे. यात फळबागांचे १८३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.५ जिल्ह्यांत तीव्र दुष्काळमराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी वगळून इतर भागाला मोठा फटका बसला आहे.चा-याच्याही दुष्काळाची शक्यताराज्यात डिसेंबरनंतर चा-याची तीव्र टंचाई होण्याची भीती कृषी अधिकाºयांनी वर्तवली. त्यामुळे पशुधन जगविण्यासाठी सरकारला मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून चारा आणावा लागेल. मराठवाड्यात चाºयाचा प्रश्न अधिक तीव्र असेल. विदर्र्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये चारा छावण्यांचे नियोजन करावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र