शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा, काँग्रेसमध्ये सामसूम

By अतुल कुलकर्णी | Published: January 18, 2018 4:31 AM

राज्यभर हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांचे सगळे प्रमुख नेते एकत्रितपणे सरकारविरोधी वातावरण तयार करत फिरत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र सामसूम आहे

मुंबई : राज्यभर हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांचे सगळे प्रमुख नेते एकत्रितपणे सरकारविरोधी वातावरण तयार करत फिरत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र सामसूम आहे. ज्येष्ठ नेत्यांमधे एकवाक्यता होत नाही. राज्याचे नेतृत्व कोणी करायचे याविषयी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात चुरस लागल्याने पक्षातल्या अन्य नेत्यांमध्ये मात्र कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे.

राष्ट्रवादीने मात्र सगळ्या पातळ्यांवर सरकारच्या विरोधाची धार वाढवणे सुरू केले आहे. एकीकडे अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जयंत पाटील आणि त्यांच्या बरोबरीने खा. सुप्रिया सुळे हे ज्येष्ठ नेते राज्यभर फिरत आहेत. विदर्भात त्यांनी काढलेली हल्लाबोल यात्रा यशस्वी झाली. त्याचा शेवट पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी केला गेला. मराठवाड्यात सुरू असलेल्या यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत संविधान बचाव आंदोलनात राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. यासाठी शरद पवार यांनी पडद्यामागून सूत्रे हलवली असून फारुक अब्दुल्ला, शरद यादव, सीताराम येचुरी यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गजांना त्यांनी आमंत्रित केले आहे.

या आंदोलनात काँग्रेसचे नेते सहभागी व्हावेत अशी आमची इच्छा असल्याचे राष्ट्रवादीचे नेते बोलत असताना काँग्रेसने स्वतंत्र प्रेसनोट काढून काँग्रेसचे सगळे नेते यात सहभागी होतील असे दोन दिवसांनी जाहीर केले. आमच्या वरिष्ठ नेत्यांचे आपापसांतील वादच संपत नाहीत. राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात, संघटनेच्या कामात मी कसा हस्तक्षेप करणार? अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना विखेंचे विधिमंडळातील काम पटत नाही. विदर्भातील नेत्यांनी स्वतंत्र विदर्भ काँग्रेसचे पिल्लू सोडून दिले आहे. पक्षातर्फे मोठे राज्यव्यापी आंदोलन कोणी घेत नाही, अशा स्थितीत आम्ही करायचे तरी काय, असा सवाल काँग्रेसचे अनेक आमदार करत आहेत.भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक मुंबईत झाली. त्यात आता लोकसभेसाठी सज्ज व्हा असे सांगण्यात आले. तेव्हा आम्हाला कोणतेही पद दिले नाही, मान दिला नाही; आणि आता निवडणुका जवळ आल्या की आम्हालाच कामाला लागा म्हणता, आम्ही कोणत्या तोंडाने लोकांसमोर जायचे, असे प्रश्न अनेक पदाधिकाºयांनी विचारल्याचे एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस