शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

राष्ट्रवादीचा २४ जागांचा आग्रह, काँग्रेसचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 14:44 IST

३८ ते ४० जागांवर एकमत झाल्याचा दोन्ही प्रदेशाध्यक्षांचा दावा

मुंबई : सध्या लोकसभेत राष्ट्रवादीचे ५ तर काँग्रेसचे २ खासदार आहेत. त्यामुळे आम्हाला ४८ पैकी २४ जागा द्या, असा आग्रह शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी पक्षाने धरला, मात्र काँग्रेस २४ जागा देण्यास तयार नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत निर्णय झाला नाही. ५ राज्यांच्या विधानसभांचे निकाल ११ डिसेंबरला आहेत. त्यानंतर वाटपावर अंतिम निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.आमचे ३८ ते ४० जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित जागांचा प्रश्नही दिवाळीनंतर सोडवला जाईल असे दोन्ही प्रदेशाध्यक्षांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उर्वरित आठ जागांवर मित्रपक्षांशी चर्चा करुन निर्णय घेतले जातील. १९ नोव्हेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे, त्याकाळात बैठक होईल व अंतीम शिक्कामोर्तब केले जाईल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील यांनी देखील हेच सांगितले. ते म्हणाले, मित्रपक्षापैकी खा. राजू शेट्टी, समाजवादी पक्ष, सीपीएम आणि सीपीआय यांच्याशी १९ नोव्हेंबरनंतर बोलणी होईल. त्यांच्यासाठी कोणत्या व कोणी जागा सोडायच्या यावर निर्णय होईल.दिंडोरीची जागा राष्ट्रवादीच्या भारती पवार यांनी लढवली होती. त्या पराभूत झाल्या होत्या. ही जागा आता सीपीयआयने मागितली आहे. तर पालघरची जागा हितेंद्र ठाकूरसाठी काँग्रेसने सोडावी आणि ठाकूर यांनाही आघाडीत घ्यावे असाही आजच्या बैठकीत सूर होता. त्याशिवाय काँग्रेसने अमरावती, अहमदनगर या २ जागा मागितल्या, ज्या राष्ट्रवादीकडे आहेत.राजू शेट्टी यांना हव्यात चार जागाराष्ट्रवादीने २०१४ साली २१ जागा लढवल्या होत्या. या वेळी त्यांनी औरंगाबाद, पुणे, जालना, यवतमाळ व हातकणंगले यापैकी कोणत्याही ३ जागा द्या अशी मागणी केली आहे. हातकणंगलेमधून खा. राजू शेट्टी निवडून आले आहेत. त्यांना कोणाच्या कोट्यातून जागा द्यायची यावर निर्णय झालेला नाही. शिवाय शेट्टी यांनी बुलडाणा, वर्धा, सांगली आणि हातकणंगले हे मतदार संघ मागितले आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtraमहाराष्ट्र