शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

“धनंजय मुंडे CM फडणवीस-अजितदादांचे खास, कितीही पुरावे द्या, राजीनामा अशक्य”; कुणी केला दावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:48 IST

Sandeep Kshirsagar Reaction On Demand Of Dhananjay Munde Resignation: विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र होत जात असून, महायुती सरकारवर दबाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

Sandeep Kshirsagar Reaction On Demand Of Dhananjay Munde Resignation: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरली होती. आता या मागणीसाठी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. परंतु, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होत आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. यातच आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा अशक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या सीआयडी, विशेष चौकशी पथक आणि न्यायालयीन अशी तिहेरी चौकशी चालू आहे. अद्याप या चौकशीत कोणाच्या सहभागाबाबत ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. कोणी मागणी केली म्हणून लगेचच राजीनामा घेतला जाणार नाही. पुरावे असल्याशिवाय कारवाई केली जाणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा फेटाळून लावली. यानंतर आता पुन्हा एकदा अंजली दमानिया तसेच विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा अशक्य असल्याचा दावा केला आहे.

धनंजय मुंडे CM फडणवीस-अजितदादांचे खास, राजीनामा अशक्य

संदीप क्षीरसागर यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. अंजली दमानिया यांना या पोस्टमध्ये टॅगही केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, वाल्मीक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे, तसे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस व अजित पवारांचे खास आहेत. त्यामुळे राजीनामा अशक्य आहे. भले कितीही पुरावे द्या तुम्ही, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी संदीप क्षीरसागर यांच्या दाव्यावर धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर धनंजय मुंडे म्हणाले की, या सर्व गोष्टींमध्ये मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना दोषी वाटत असेन, तर त्यांनी माझा राजीनामा मागावा; मी राजीनामा देणार. पण, फक्त हा विषय काढून राजीनामा होत असेल, याबाबतीत मी दोषी आहे की नाही; हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगू शकतील. त्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजे ना. ५१ दिवस ज्या पद्धतीने ट्रायल सुरू आहे. टार्गेट मी आहे. मी पक्षाचा निष्ठावंत आहे. महायुतीच्या प्रचारातील प्रमुख व्यक्ती आहे. आपण निवडणुकीत टीका करतो. टीका सहनही करतो. पण, याबद्दलचा राग पुन्हा नसतो. माझी नैतिकता माझ्या लोकांच्याबद्दल प्रामाणिक आहे. जी गोष्ट घडलीय, त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय, ते अतिशय प्रामाणिक आहे. त्यामुळे मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही. त्यामुळे माझा दोष सांगावा लागेल. माझ्या वरिष्ठांनी सांगावा लागेल. तेच माझे म्हणणे आहे, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडDhananjay Mundeधनंजय मुंडेAjit Pawarअजित पवारSandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागर