शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

NCP शरद पवार गटाची राज ठाकरेंना ऑफर? ‘मविआ’त येऊन महाराष्ट्रधर्माचे पालन करायचे आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 12:12 IST

NCP SP Group Reaction On MNS Raj Thackeray Delhi Visit: महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्याने म्हटले आहे.

NCP SP Group Reaction On MNS Raj Thackeray Delhi Visit: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत प्रकाश आंबेडकर यांना अल्टिमेटम दिल्याचा दावा केला जात असून, दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चार दिवसांतील दुसऱ्या दिल्लीवारीमुळे त्यांच्या महायुतीमधील सहभागाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यावरून तर्क-वितर्क लढवले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्याने राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत येण्याबाबत आवाहन केल्याचे सांगितले जात आहे.

मनसे सहभागी झाल्यास महायुतीला बळ मिळेल. दक्षिण मुंबईसह मनसेला आणखी कोणते मतदारसंघ दिले जातात, याची उत्सुकता असून, मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नाशिक, पुणे या मतदारसंघांत मनसेची महायुतीला मदत होऊ शकते. शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रधर्म पालनाची आठवण करून दिली आहे. 

महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत यावे

महाराष्ट्रातील जनता भाजपासोबत नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. यामुळे भाजपा लहान पक्षांना सोबत घेऊन मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन पक्ष फोडूनही या दोन्ही पक्षांचा काही उपयोग नसल्याचे त्यांच्या ध्यानात आले आहे. यामुळे ज्या पक्षांना पाच वर्षांपूर्वी महत्व दिले जात नव्हते, त्यांची आठवण आता भाजपला झाली आहे, असे रोहित पवार म्हणाले. राज ठाकरे यांच्या भाषणांचा फॅन आहे. त्यांनी महाविकास आघाडीसोबत यावे ही आपली इच्छा आहे. भाजपसोबत जाण्याआधी त्यांनी विचार करावा. २०१९ मध्ये भाजपने छोट्या पक्षांना योग्य वागणूक दिली नव्हती, हे लक्षात घ्यावे. आता भाजपासोबत असलेल्या दोन पक्षांचा त्यांना फायदा दिसत नाही, म्हणून छोट्या पक्षांना भाव देत आहेत. महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, २०१९ प्रमाणे एकत्र येऊन भाजपाविरोधात लढलो तर राज ठाकरेंबद्दलची आपुलकी वाढेल. ते धाडसी आणि लढणारे नेते आहेत. ईडी आणि विविध संस्थांना घाबरून एखादा नेता त्यांची भूमिका बदलत असेल तर योग्य नाही. लोकांना लढणारे नेते पाहिजेत. महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या वतीने महाशक्तीच्या विरोधात जो लढेल तो लोकांच्या मनात बसणार आहे. लढायची परिस्थिती असताना भाजपाबरोबर न जाता आपण एकत्र येऊन लढले पाहिजे. तसेच महाराष्ट्राच्या बाजूने लढणे महत्त्वाचे आहे. ऑफर देणारा मी कोण आहे. आमचे नेते यासंदर्भात निर्णय घेतील. माझे एकच मत आहे की त्यांनी पुढाकार घेऊन चर्चा करणे गरजेचे आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीRohit Pawarरोहित पवार