शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

Coronavirus: “...तरच कोरोनाच्या संकटावर आपण मात करू शकू!”; रोहित पवारांनी सांगितला फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 16:21 IST

Coronavirus: रोहित पवार यांनी केंद्र सरकारला टोला लगावत एक चांगला सल्लाही दिला आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरताना दिसत आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशासाठी ही दिलासादायक बाब असल्याचे सांगितले जात आहे. तर, दुसरीकडे अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. मात्र, यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कोरोनाच्या संकटावर आपण मात करू शकू, असा विश्वास व्यक्त केला आहे. (ncp rohit pawar criticised modi govt over corona vaccine policy)

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या एका सुनावणीवेळी कोरोना लसीकरणाच्या मोहिमेवरून तसेच कोविन अॅपच्या आवश्यकतेवरून केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले आहे. न्यायालयाने व्यक्त केलेल्या मतांचे स्वागत करत रोहित पवार यांनी केंद्र सरकारला टोला लगावत एक चांगला सल्लाही दिला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा! ९७ टक्के कुटुंबांची कमाई घटली; १ कोटी रोजगार गेले

हे केंद्र सरकारने लक्षात घ्यावं

पहिल्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात की, भारत हे संघराज्य असल्याची आठवण खुद्द सुप्रीम कोर्टानेच सरकारला करून दिली, हे बरं झालं. प्रश्न उरतो कोर्टाचं म्हणणं सकारात्मक घेऊन आपण त्यात बदल करतो की नाही याचा! राज्या-राज्यात स्पर्धा लावून करोनाचं संकट टळणार नाही, तर केवळ राज्यांची दमछाक होईल, हे केंद्र सरकारने लक्षात घ्यावं!, असे रोहित पवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी केले लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन; तीन जणांना अटक

कोरोनाच्या संकटावर आपण मात करू शकू!

दुसऱ्या एका ट्विटमध्ये रोहित पवार यांनी सल्ला देत सांगितले की, कोरोनाने थैमान मांडल्याने देशाची अर्थव्यवस्था गडगडली आणि बेरोजगारी वाढली. अशा परिस्थितीत सरकारने कोरोना नियंत्रणावर आधी पूर्ण लक्ष केंद्रित करून राज्यांमध्ये कोणताही दुजाभाव न करता त्यांना मदत करावी. असं केलं तरच कोरोनाच्या संकटावर आपण मात करू शकू!, असे रोहित पवार म्हणाले. 

दरम्यान, राज्य सरकार कोरोना लशींसाठी ग्लोबल टेंडर काढत आहेत. हेच केंद्र सरकारचे धोरण आहे का? लशींसाठी आपण राज्यांमध्ये स्पर्धा लावण्याचा प्रयत्न करीत आहात का? आम्हाला स्पष्ट दिसत आहे की, वेगवेगळी राज्य आणि महानगरपालिका ग्लोबल टेंडर काढत आहेत. राज्य आणि महानगरपालिकेने त्यांचे त्यांचे पाहून घ्यावे, अशी सरकारची भूमिका आहे का? मुंबई महापालिकेच्या बजेटची तुलना इतर राज्यातील शहरांशी करा. काही राज्यांपेक्षा मुंबई महापालिकेचे बजेट मोठे आहे. महापालिकांना ग्लोबल टेंडरसाठी आपण परवागनगी देत आहात का? लशींची किंमत आणि वाटाघाटीसाठी केंद्राकडे काही योजना आहे का?, असे प्रश्न उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलेच सुनावले होते.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसState Governmentराज्य सरकार