शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

Rohit Pawar on Sanjay Raut: “शब्द जपून, मोजून वापरले पाहिजे, महाराष्ट्रात पूर्वी असं नव्हतं”; रोहित पवारांचा राऊतांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 17:53 IST

Rohit Pawar on Sanjay Raut: ईडीने केलेल्या कारवाईनंतर त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

पंढरपूर: आताच्या घडीला महाराष्ट्राती राजकारण विविध मुद्द्यांमुळे ढवळून निघत आहे. एकीकडे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्याचा उपस्थित केलेला मुद्दा आणि दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ठिकाणांवर ईडीने कारवाई केल्यानंतर किरीट सोमय्यांवर टीका करताना राऊतांची जीभ पुन्हा एकदा घसरली. यावरून अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यातच आता शरद पवार यांचे नातू, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही संजय राऊतांच्या वाणीवर नाराजी व्यक्त करत सल्ला दिला आहे. 

संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत असंसदीय आणि खालच्या भाषेत किरीट सोमय्यांवर टीका केली. संजय राऊत यांच्या या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. यातच रोहित पवार यांनीही यासंदर्भात आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. रोहित पवार यांनी पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर झालेली ईडीची कारवाई आणि अन्य मुद्द्यांवर भाष्य केले. 

शब्द जपून आणि मोजून वापरले पाहिजेत

सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे जपून आणि मोजून वापरले पाहिजेत. केंद्रीय तपास यंत्रणेने कारवाई केल्यानंतर त्यांची भावना आपण समजू शकतो. भाजप सूड भावनेने कारवाई करत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भावना व्यक्त केली आहे. मात्र बोलताना सर्वच राजकीय नेत्यांनी मोजून आणि मोपून बोलले पाहिजे. एखाद्याच्या राहत्या घरी, जिथे तुमचे कुटुंब राहते तिथे राजकीय हेतून कारवाई झाली तर माणूस भावनिक होत असतो. एखादी व्यक्ती खूपच जास्त भावनिक झाली तर कधी कधी शब्द वेगळ्या अर्थाने निघू शकतात. अशा ठिकाणी आपण भावना समजून घेतल्या पाहिजेत, असे रोहित पवार म्हणाले. 

अशा ठिकाणी भावना अधिक महत्वाच्या असतात

शब्द सर्वांनीच जपून वापरले पाहिजेत. अशा ठिकाणी भावना अधिक महत्वाच्या असतात. एखाद्या कुटुंबावर कारवाई होते, तेव्हा त्या कुटुंबातील सदस्य राजकीय लोक नसतात. त्यांना त्या गोष्टी कळतही नसतात. लोकं घाबरतात, कुठेतरी टेन्शन घेतात. अशा प्रकारचे नवीन राजकारण सुरु झाल्याचे सध्या दिसत आहे. महाराष्ट्रात असे यापूर्वी नव्हते. महाराष्ट्रातील लोकांना हे सगळे समजत आहे. दिल्लीपुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही, असे महाराष्ट्रातील लोकांच्यावतीने या ठिकाणी सांगतो, असे रोहित पवार यांनी सांगितले. 

दरम्यान, संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची फैरी वेगळ्याच टोकाला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. हे सगळे महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही आयएनएस विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी जमा करतात आणि भ्रष्टाचार बाहेर काढल्यानंतर पराक्रम म्हणता. हा देशद्रोह आहे. देशभावनाच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार भाजपने केला आहे, असा आरोप करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत अटक झाली पाहिजे, अशी मागणी संजय राऊतांनी केली. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारSanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी