शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

Rohit Pawar on Sanjay Raut: “शब्द जपून, मोजून वापरले पाहिजे, महाराष्ट्रात पूर्वी असं नव्हतं”; रोहित पवारांचा राऊतांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 17:53 IST

Rohit Pawar on Sanjay Raut: ईडीने केलेल्या कारवाईनंतर त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

पंढरपूर: आताच्या घडीला महाराष्ट्राती राजकारण विविध मुद्द्यांमुळे ढवळून निघत आहे. एकीकडे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्याचा उपस्थित केलेला मुद्दा आणि दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ठिकाणांवर ईडीने कारवाई केल्यानंतर किरीट सोमय्यांवर टीका करताना राऊतांची जीभ पुन्हा एकदा घसरली. यावरून अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यातच आता शरद पवार यांचे नातू, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही संजय राऊतांच्या वाणीवर नाराजी व्यक्त करत सल्ला दिला आहे. 

संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत असंसदीय आणि खालच्या भाषेत किरीट सोमय्यांवर टीका केली. संजय राऊत यांच्या या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. यातच रोहित पवार यांनीही यासंदर्भात आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. रोहित पवार यांनी पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर झालेली ईडीची कारवाई आणि अन्य मुद्द्यांवर भाष्य केले. 

शब्द जपून आणि मोजून वापरले पाहिजेत

सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे जपून आणि मोजून वापरले पाहिजेत. केंद्रीय तपास यंत्रणेने कारवाई केल्यानंतर त्यांची भावना आपण समजू शकतो. भाजप सूड भावनेने कारवाई करत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भावना व्यक्त केली आहे. मात्र बोलताना सर्वच राजकीय नेत्यांनी मोजून आणि मोपून बोलले पाहिजे. एखाद्याच्या राहत्या घरी, जिथे तुमचे कुटुंब राहते तिथे राजकीय हेतून कारवाई झाली तर माणूस भावनिक होत असतो. एखादी व्यक्ती खूपच जास्त भावनिक झाली तर कधी कधी शब्द वेगळ्या अर्थाने निघू शकतात. अशा ठिकाणी आपण भावना समजून घेतल्या पाहिजेत, असे रोहित पवार म्हणाले. 

अशा ठिकाणी भावना अधिक महत्वाच्या असतात

शब्द सर्वांनीच जपून वापरले पाहिजेत. अशा ठिकाणी भावना अधिक महत्वाच्या असतात. एखाद्या कुटुंबावर कारवाई होते, तेव्हा त्या कुटुंबातील सदस्य राजकीय लोक नसतात. त्यांना त्या गोष्टी कळतही नसतात. लोकं घाबरतात, कुठेतरी टेन्शन घेतात. अशा प्रकारचे नवीन राजकारण सुरु झाल्याचे सध्या दिसत आहे. महाराष्ट्रात असे यापूर्वी नव्हते. महाराष्ट्रातील लोकांना हे सगळे समजत आहे. दिल्लीपुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही, असे महाराष्ट्रातील लोकांच्यावतीने या ठिकाणी सांगतो, असे रोहित पवार यांनी सांगितले. 

दरम्यान, संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची फैरी वेगळ्याच टोकाला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. हे सगळे महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही आयएनएस विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी जमा करतात आणि भ्रष्टाचार बाहेर काढल्यानंतर पराक्रम म्हणता. हा देशद्रोह आहे. देशभावनाच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार भाजपने केला आहे, असा आरोप करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत अटक झाली पाहिजे, अशी मागणी संजय राऊतांनी केली. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारSanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी