शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

Rohit Pawar on Sanjay Raut: “शब्द जपून, मोजून वापरले पाहिजे, महाराष्ट्रात पूर्वी असं नव्हतं”; रोहित पवारांचा राऊतांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 17:53 IST

Rohit Pawar on Sanjay Raut: ईडीने केलेल्या कारवाईनंतर त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

पंढरपूर: आताच्या घडीला महाराष्ट्राती राजकारण विविध मुद्द्यांमुळे ढवळून निघत आहे. एकीकडे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्याचा उपस्थित केलेला मुद्दा आणि दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ठिकाणांवर ईडीने कारवाई केल्यानंतर किरीट सोमय्यांवर टीका करताना राऊतांची जीभ पुन्हा एकदा घसरली. यावरून अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यातच आता शरद पवार यांचे नातू, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही संजय राऊतांच्या वाणीवर नाराजी व्यक्त करत सल्ला दिला आहे. 

संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत असंसदीय आणि खालच्या भाषेत किरीट सोमय्यांवर टीका केली. संजय राऊत यांच्या या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. यातच रोहित पवार यांनीही यासंदर्भात आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. रोहित पवार यांनी पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर झालेली ईडीची कारवाई आणि अन्य मुद्द्यांवर भाष्य केले. 

शब्द जपून आणि मोजून वापरले पाहिजेत

सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे जपून आणि मोजून वापरले पाहिजेत. केंद्रीय तपास यंत्रणेने कारवाई केल्यानंतर त्यांची भावना आपण समजू शकतो. भाजप सूड भावनेने कारवाई करत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भावना व्यक्त केली आहे. मात्र बोलताना सर्वच राजकीय नेत्यांनी मोजून आणि मोपून बोलले पाहिजे. एखाद्याच्या राहत्या घरी, जिथे तुमचे कुटुंब राहते तिथे राजकीय हेतून कारवाई झाली तर माणूस भावनिक होत असतो. एखादी व्यक्ती खूपच जास्त भावनिक झाली तर कधी कधी शब्द वेगळ्या अर्थाने निघू शकतात. अशा ठिकाणी आपण भावना समजून घेतल्या पाहिजेत, असे रोहित पवार म्हणाले. 

अशा ठिकाणी भावना अधिक महत्वाच्या असतात

शब्द सर्वांनीच जपून वापरले पाहिजेत. अशा ठिकाणी भावना अधिक महत्वाच्या असतात. एखाद्या कुटुंबावर कारवाई होते, तेव्हा त्या कुटुंबातील सदस्य राजकीय लोक नसतात. त्यांना त्या गोष्टी कळतही नसतात. लोकं घाबरतात, कुठेतरी टेन्शन घेतात. अशा प्रकारचे नवीन राजकारण सुरु झाल्याचे सध्या दिसत आहे. महाराष्ट्रात असे यापूर्वी नव्हते. महाराष्ट्रातील लोकांना हे सगळे समजत आहे. दिल्लीपुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही, असे महाराष्ट्रातील लोकांच्यावतीने या ठिकाणी सांगतो, असे रोहित पवार यांनी सांगितले. 

दरम्यान, संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची फैरी वेगळ्याच टोकाला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. हे सगळे महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही आयएनएस विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी जमा करतात आणि भ्रष्टाचार बाहेर काढल्यानंतर पराक्रम म्हणता. हा देशद्रोह आहे. देशभावनाच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार भाजपने केला आहे, असा आरोप करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत अटक झाली पाहिजे, अशी मागणी संजय राऊतांनी केली. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारSanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी