शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केलं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच प्रगती पुस्तक, दिला असा शेरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 15:26 IST

Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्रातून माघारी जाणाऱ्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं प्रगती पुस्तक प्रसिद्ध करत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. 

विविध वादग्रस्त विधाने, राजकीय निर्णय आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या अपमानकारक वक्तव्यांमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. दरम्यान, चौफेर टीकेनंतर भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपतींकडे पाठवलेला राजीनामा मंजूर करून त्यांना पदमुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून माघारी जाणाऱ्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं प्रगती पुस्तक प्रसिद्ध करत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. तसेच हे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाराष्ट्र भाजपाला टॅग केले आहे. 

हे प्रगती पुस्तक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबूक अकाऊंटवरून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्याला प्रगती शब्दावर काट मारून अधोगती पुस्तक असं नाव देण्यात आलं आहे. तसेच राज्यपालांच्या नावाचा उल्लेख भगतसिंह श्यारी असा करून ते व्हॉट्सअॅप विद्यालयातील ढ तुकडीमधील असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच त्यांना इतिहास या विषयात शून्य गुण असल्याचे लिहून त्यांना टोला लगावण्यात आला आहे. त्याबरोबरच सदर विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता पाहता पालकांनी विशेष लक्ष देण्याची सवय आहे. या विद्यार्थ्याची वर्तणुक पाहता याची बालवाडीपासून सुरुवात करण्याची गरज आहे असा शेरा देण्यात आला आहे. 

सोबतच एक पत्रही जोडण्यात आले आहे. त्या पत्रामधूनही कोश्यारी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पत्रास कारण की, आमच्या शाळेतील भगतसिंह श्यारी नामक विद्यार्थ्याला तात्काळ शाळेतून कमी करण्यात आले आहे. सदर विद्यार्थ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्याने सुधारणेच कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर त्याची गच्छंती करण्यात येत आहे सदरहू विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता अगदीच तोकडी असून मनोरंजनपर विषयात गती असली तरी बाकी विषयांचा अभ्यास फार कच्चा आहे. आपली जबाबदारी ओळखण्याऐवजी इतर विद्यार्थ्यांविषयी चुकीची माहिती पसरवण्याचे काम विद्यार्थ्यांने केले आहे. तसेच खोडसाळपणा, नियमांचे उल्लंघन, शाळेतील शांततेचा भंग करणे आणि वाद निर्माण करणे अशी कृत्ये विद्यार्थी सातत्याने करत असतो. या वृत्तीमुळे तुमच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांवरही संगतीचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सदर विद्यार्थ्यास शाळेत प्रवेश देण्याचा विचार असल्यास वरील सर्व बाबींची गंभीर नोंद घ्यावी, ही विनंती, असे या पत्रात म्हटले आहे, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पत्रप्रपंचामुळे हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची गरज आहे. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र