शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केलं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच प्रगती पुस्तक, दिला असा शेरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 15:26 IST

Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्रातून माघारी जाणाऱ्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं प्रगती पुस्तक प्रसिद्ध करत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. 

विविध वादग्रस्त विधाने, राजकीय निर्णय आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या अपमानकारक वक्तव्यांमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. दरम्यान, चौफेर टीकेनंतर भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपतींकडे पाठवलेला राजीनामा मंजूर करून त्यांना पदमुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून माघारी जाणाऱ्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं प्रगती पुस्तक प्रसिद्ध करत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. तसेच हे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाराष्ट्र भाजपाला टॅग केले आहे. 

हे प्रगती पुस्तक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबूक अकाऊंटवरून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्याला प्रगती शब्दावर काट मारून अधोगती पुस्तक असं नाव देण्यात आलं आहे. तसेच राज्यपालांच्या नावाचा उल्लेख भगतसिंह श्यारी असा करून ते व्हॉट्सअॅप विद्यालयातील ढ तुकडीमधील असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच त्यांना इतिहास या विषयात शून्य गुण असल्याचे लिहून त्यांना टोला लगावण्यात आला आहे. त्याबरोबरच सदर विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता पाहता पालकांनी विशेष लक्ष देण्याची सवय आहे. या विद्यार्थ्याची वर्तणुक पाहता याची बालवाडीपासून सुरुवात करण्याची गरज आहे असा शेरा देण्यात आला आहे. 

सोबतच एक पत्रही जोडण्यात आले आहे. त्या पत्रामधूनही कोश्यारी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पत्रास कारण की, आमच्या शाळेतील भगतसिंह श्यारी नामक विद्यार्थ्याला तात्काळ शाळेतून कमी करण्यात आले आहे. सदर विद्यार्थ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्याने सुधारणेच कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर त्याची गच्छंती करण्यात येत आहे सदरहू विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता अगदीच तोकडी असून मनोरंजनपर विषयात गती असली तरी बाकी विषयांचा अभ्यास फार कच्चा आहे. आपली जबाबदारी ओळखण्याऐवजी इतर विद्यार्थ्यांविषयी चुकीची माहिती पसरवण्याचे काम विद्यार्थ्यांने केले आहे. तसेच खोडसाळपणा, नियमांचे उल्लंघन, शाळेतील शांततेचा भंग करणे आणि वाद निर्माण करणे अशी कृत्ये विद्यार्थी सातत्याने करत असतो. या वृत्तीमुळे तुमच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांवरही संगतीचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सदर विद्यार्थ्यास शाळेत प्रवेश देण्याचा विचार असल्यास वरील सर्व बाबींची गंभीर नोंद घ्यावी, ही विनंती, असे या पत्रात म्हटले आहे, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पत्रप्रपंचामुळे हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची गरज आहे. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र