शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
2
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

देशात नवा मोदी अ‍ॅक्ट आलाय की काय? नवाब मलिकांचा भाजपवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 15:19 IST

remdesivir issue: कोरोना परिस्थितीवरून भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने टीका करताना दिसत आहेत.

ठळक मुद्देनवाब मलिक यांचे भाजपला सडेतोड प्रत्युत्तरनवा मोदी कायदा आलाय का? - मलिकलोकहितासाठीच आम्ही बोलत होतो - मलिक

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अधिकच गंभीर असून, अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे कोरोना रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स अपुरे पडत आहेत. कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना दिसत आहे. कोरोना परिस्थितीवरून भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावरही टीका करण्यात आली होती. देशात नवा मोदी अ‍ॅक्ट आलाय की काय, अशा शब्दांत मलिक यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. (nawab malik replied bjp and devendra fadnavis over remdesivir issue) 

देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. पण, काही पक्षाना राजकारण करण्याशिवाय काहीच काम नाही. महाराष्ट्रात भाजपाकडून अपप्रचार केला जात आहे. देशातील सात रेमडेसिवीर कंपन्यांना केंद्राने परवानगी दिलेली आहे. दुसरीकडे रुग्णांचे आकडे वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर रेमडेसिवीर मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले होते, असे नवाब मलिक म्हणाले.

“माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव”

नवा मोदी कायदा आलाय का?

देशात नवा मोदी कायदा आलाय की काय, अशी विचारणा यावेळी मलिक यांनी केली. रेमडेसिविरच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केल्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मलिक यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले. राज्यात रेमडेसिविरचा तुटवडा असताना काही कंपन्या राज्य सरकारला रेमडेसिविर द्यायला तयार नव्हत्या. ब्रुक फार्माला महाराष्ट्र सरकारच्या एफडीएनं परवानगी दिली होती. मात्र, ही कंपनी केंद्रशासित दमणमध्ये रेमडेसिविरची निर्मिती करते. तेथील प्रशासनानं महाराष्ट्राला पुरवठा करता येणार नाही असे निर्बंध त्यांच्यावर घातले होते. त्यामुळं कुठेतरी केंद्र सरकारकडून अडवणूक होते आहे असा मुद्दा मी उपस्थित केला होता, असे मलिक यांनी सांगितले.

म्हणून माझ्या राजीनाम्याची मागणी होतेय

केवळ राजकारण करण्यासाठी आम्ही हा मुद्दा उपस्थित केला नव्हता. लोकहितासाठीच आम्ही बोलत होतो. मात्र, करोना संकटाचा फायदा घेऊन भाजपचे लोक काही दिवसांपासून राज्य सरकारला बदनाम करत आहेत. रेमडेसिविरचा मुद्दा उपस्थित केल्यामुळेच माझ्या राजीनाम्याची मागणी होतेय. जावयाला अटक झाल्यामुळे मलिक केंद्र सरकारच्या विरोधात बोलताहेत, असे फडणवीस म्हणत होते. पण महाराष्ट्राची जनता सर्व काही जाणते. माझ्या जावयाचा विषय न्यायालयात आहे. तिथे काय व्हायचे, ते होईल, असे मलिक यांनी स्पष्ट केले. 

 “देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

दरम्यान, नवाब मलिक यांनी खोटा आरोप केला असून, त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लोक महाराष्ट्र सोडून चालले आहेत, असे उलट आरोप करत भाजपने मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. भाजपचे काही नेते राज्यपालांनाही भेटले होते.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliticsराजकारणnawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा