शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

देशात नवा मोदी अ‍ॅक्ट आलाय की काय? नवाब मलिकांचा भाजपवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 15:19 IST

remdesivir issue: कोरोना परिस्थितीवरून भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने टीका करताना दिसत आहेत.

ठळक मुद्देनवाब मलिक यांचे भाजपला सडेतोड प्रत्युत्तरनवा मोदी कायदा आलाय का? - मलिकलोकहितासाठीच आम्ही बोलत होतो - मलिक

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अधिकच गंभीर असून, अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे कोरोना रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स अपुरे पडत आहेत. कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना दिसत आहे. कोरोना परिस्थितीवरून भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावरही टीका करण्यात आली होती. देशात नवा मोदी अ‍ॅक्ट आलाय की काय, अशा शब्दांत मलिक यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. (nawab malik replied bjp and devendra fadnavis over remdesivir issue) 

देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. पण, काही पक्षाना राजकारण करण्याशिवाय काहीच काम नाही. महाराष्ट्रात भाजपाकडून अपप्रचार केला जात आहे. देशातील सात रेमडेसिवीर कंपन्यांना केंद्राने परवानगी दिलेली आहे. दुसरीकडे रुग्णांचे आकडे वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर रेमडेसिवीर मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले होते, असे नवाब मलिक म्हणाले.

“माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव”

नवा मोदी कायदा आलाय का?

देशात नवा मोदी कायदा आलाय की काय, अशी विचारणा यावेळी मलिक यांनी केली. रेमडेसिविरच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केल्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मलिक यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले. राज्यात रेमडेसिविरचा तुटवडा असताना काही कंपन्या राज्य सरकारला रेमडेसिविर द्यायला तयार नव्हत्या. ब्रुक फार्माला महाराष्ट्र सरकारच्या एफडीएनं परवानगी दिली होती. मात्र, ही कंपनी केंद्रशासित दमणमध्ये रेमडेसिविरची निर्मिती करते. तेथील प्रशासनानं महाराष्ट्राला पुरवठा करता येणार नाही असे निर्बंध त्यांच्यावर घातले होते. त्यामुळं कुठेतरी केंद्र सरकारकडून अडवणूक होते आहे असा मुद्दा मी उपस्थित केला होता, असे मलिक यांनी सांगितले.

म्हणून माझ्या राजीनाम्याची मागणी होतेय

केवळ राजकारण करण्यासाठी आम्ही हा मुद्दा उपस्थित केला नव्हता. लोकहितासाठीच आम्ही बोलत होतो. मात्र, करोना संकटाचा फायदा घेऊन भाजपचे लोक काही दिवसांपासून राज्य सरकारला बदनाम करत आहेत. रेमडेसिविरचा मुद्दा उपस्थित केल्यामुळेच माझ्या राजीनाम्याची मागणी होतेय. जावयाला अटक झाल्यामुळे मलिक केंद्र सरकारच्या विरोधात बोलताहेत, असे फडणवीस म्हणत होते. पण महाराष्ट्राची जनता सर्व काही जाणते. माझ्या जावयाचा विषय न्यायालयात आहे. तिथे काय व्हायचे, ते होईल, असे मलिक यांनी स्पष्ट केले. 

 “देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

दरम्यान, नवाब मलिक यांनी खोटा आरोप केला असून, त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लोक महाराष्ट्र सोडून चालले आहेत, असे उलट आरोप करत भाजपने मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. भाजपचे काही नेते राज्यपालांनाही भेटले होते.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliticsराजकारणnawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा