शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

...तर मी अजितदादांसोबत भाजपबरोबर गेलो असतो; रोहित पवारांनी काकांना कोंडीत पकडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 13:48 IST

आमच्यासाठी विचार, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची असल्याने आम्ही भाजपसोबत गेलो नाही, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे.

NCP Rohit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर कथित शिखर बँक गैरव्यवहाराप्रकरणी शुक्रवारी ईडीने छापेमारी केली. रोहित पवारांच्या बारामतीतील कारखान्यासह मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापेमारीवरून राजकीय वातावरण तापलं असून आज पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी आपली बाजू मांडली. तसंच सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

घरभेदी लोकांमुळे रोहित पवार यांच्या कारखान्यांवर ईडीने छापेमारी केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं होतं. याबाबत बोलताना रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, "या विषयावर मला फार भाष्य करायचं नाही. मात्र मागील सात दिवसांत भाजपचे आणि अजितदादा मित्र मंडळाचे कोणकोणते नेते दिल्लीला गेले होते, याचा तपशील काढल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी कळतील. आज सत्तेतील नेते फार मोठमोठ्या आवाजात बोलत आहेत. पण मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की, मी खरंच चूक केली असती तर काल परदेशात असतानाही कारवाईनंतर इथं आलो नसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी अजितदादांसोबतच भाजपबरोबर गेलो असतो. परंतु मी असं काहीही केलेलं नाही. कारण आमच्यासाठी विचार, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची आहे," असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीसांवरही पलटवार

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल रोहित पवारांवर निशाणा साधला होता. "आजकाल ईडीच्या नावाने शहीद होण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात. मात्र ज्यांनी चूक केली नसेल त्यांनी घाबरण्याचं कारण नाही," असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, "राज्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे. गृहमंत्री ज्या शहरात असतात तिथेच लोकांचे खून होऊ लागले आहेत. इतर नेत्यांबद्दल बोलण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी कायदा-सुव्यस्थेवर लक्ष द्यावं आणि ही जबाबदारी पेलत नसेल तर त्यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा," अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.

दरम्यान, "लोक खूप हुशार आहेत. या सर्व कारवाया ते उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. काही लोकांना यावरून राजकारण करायचंय," असंही रोहित पवार म्हणाले.

 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारAjit Pawarअजित पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस