शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'त्या' खास माणसासाठी शरद पवार राजू शेट्टींचा पत्ता कापणार?; अजित पवारांकडूनही संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 09:47 IST

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीतून राजू शेट्टींचा पत्ता कट होण्याची शक्यता

मुंबई: राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबद्दलचा पेच अजूनही कायम आहे. ८ महिने उलटून गेल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारनं दिलेली यादी मंजूर केलेली नाही. त्यातच आता १२ पैकी काही जणांचा पत्ता कापण्यात येण्याची शक्यता वाढली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आमदारकी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निष्ठावंत नेत्याला आमदारकी मिळू शकते.“दिलेला शब्द पाळायचा की नाही, हे राष्ट्रवादीनं ठरवावं”; राजू शेट्टींनी करुन दिली बैठकांची आठवण

माजी खासदार राजू शेट्टी यांचं नाव १२ जणांच्या यादीत आहे. शेट्टी यांच्या आमदारकीबद्दल कालच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका नियमाचा संदर्भ देत सूचक विधान केलं. 'निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीला राज्यपाल आमदार म्हणून नियुक्त करत नाहीत असा नियम असल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही तथ्य तपासत आहोत. शहानिशा सुरू आहे. यात जर काही अडचण आली, तर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील,' असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे शेट्टींचा पत्ता कापला जाणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.राजू शेट्टींच्या आमदारकीवरून पेच; अडचणीचा 'तो' नियम सांगत अजित पवार म्हणाले...

राजू शेट्टींच्या जागी हेमंत टकले?राजू शेट्टींच्या जागी राष्ट्रवादीचे नेते हेमंत टकले यांना विधान परिषदेवर संधी मिळू शकते. हेमंत टकले शरद पवारांचे अतिशय विश्वासू आहेत. पवारांचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख आहे. २००८ ते २०१४ आणि २०१४ ते २०२० अशी १२ वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष असलेले टकले यांचं विविध संस्थांच्या जडणघडणीत मोलाचं योगदान आहे. कला, साहित्य क्षेत्राचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. 

काय म्हणाले राजू शेट्टी?स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेची एक जागा द्यायची हा समझोता लोकसभा निवडणुकीच्या आधी झाला होता. दिल्लीत माझी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीने एक लोकसभा मतदारसंघ आमच्यासाठी सोडावा, अशी आमची मागणी होती. मात्र, त्याऐवजी विधान परिषदेची जागा देण्याचे शरद पवार यांनी मान्य केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. दिलेला शब्द पाळायचा की नाही हे आता राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवावे, असे राजू शेट्टी म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaju Shettyराजू शेट्टीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार