शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

शिंदे गटात नाराजी, राष्ट्रवादीला सोबत घेताना विश्वासात घेतलं नाही; बच्चू कडूंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 18:09 IST

NCP Maharashtra Politics : अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे.

NCP Maharashtra Politics : गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना घेऊन शिवसेनेत बंड केले आणि भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन केले. तशाच प्रकारची घटना आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली. अजित पवार समर्थक आमदारांसह सत्तेत सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर टीका करत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बंड केले होते. आता तेच नेते सत्तेत सामील झाल्याने शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. यावर माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे.

2 जुलै रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी 30-35 आमदारांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केले. अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवार आणि अजित पवार, असे दोन गट तयार झाले आहे. एकीकडे शिंदे गटाचे नेते मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत होते, तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार होऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर शिंदे गटातील नेते नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. 

आता याबाबत आमदार बच्चू कडू यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये घेताना विश्वासात घेतले नाही. राष्ट्रवादीला सोबत घेण्यापूर्वी मंथन आणि चिंतन व्हायला पाहिजे होते.  राष्ट्रवादीला सरकारमध्ये सोबत घेतल्याने आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या सर्व आमदारांची अडचण झाली आहे. 

मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा त्रास होता, काम होत नव्हते. शिवसेनेचे मतदारसंघ फोडले जात होते, असा आरोप होता. मात्र आता ज्या नेत्यांवर शिंदे गटाकडून आरोप केले जायचे, त्याच नेत्यांना भाजपने जवळ केले आहे. यामुळे नक्कीच शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी आहे. या नाराजीचा स्फोट होऊ शकतो, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBacchu Kaduबच्चू कडूSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष