शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटात नाराजी, राष्ट्रवादीला सोबत घेताना विश्वासात घेतलं नाही; बच्चू कडूंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 18:09 IST

NCP Maharashtra Politics : अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे.

NCP Maharashtra Politics : गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना घेऊन शिवसेनेत बंड केले आणि भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन केले. तशाच प्रकारची घटना आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली. अजित पवार समर्थक आमदारांसह सत्तेत सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर टीका करत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बंड केले होते. आता तेच नेते सत्तेत सामील झाल्याने शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. यावर माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे.

2 जुलै रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी 30-35 आमदारांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केले. अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवार आणि अजित पवार, असे दोन गट तयार झाले आहे. एकीकडे शिंदे गटाचे नेते मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत होते, तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार होऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर शिंदे गटातील नेते नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. 

आता याबाबत आमदार बच्चू कडू यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये घेताना विश्वासात घेतले नाही. राष्ट्रवादीला सोबत घेण्यापूर्वी मंथन आणि चिंतन व्हायला पाहिजे होते.  राष्ट्रवादीला सरकारमध्ये सोबत घेतल्याने आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या सर्व आमदारांची अडचण झाली आहे. 

मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा त्रास होता, काम होत नव्हते. शिवसेनेचे मतदारसंघ फोडले जात होते, असा आरोप होता. मात्र आता ज्या नेत्यांवर शिंदे गटाकडून आरोप केले जायचे, त्याच नेत्यांना भाजपने जवळ केले आहे. यामुळे नक्कीच शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी आहे. या नाराजीचा स्फोट होऊ शकतो, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBacchu Kaduबच्चू कडूSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष