शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

शिंदे गटात नाराजी, राष्ट्रवादीला सोबत घेताना विश्वासात घेतलं नाही; बच्चू कडूंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 18:09 IST

NCP Maharashtra Politics : अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे.

NCP Maharashtra Politics : गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना घेऊन शिवसेनेत बंड केले आणि भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन केले. तशाच प्रकारची घटना आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली. अजित पवार समर्थक आमदारांसह सत्तेत सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर टीका करत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बंड केले होते. आता तेच नेते सत्तेत सामील झाल्याने शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. यावर माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे.

2 जुलै रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी 30-35 आमदारांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केले. अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवार आणि अजित पवार, असे दोन गट तयार झाले आहे. एकीकडे शिंदे गटाचे नेते मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत होते, तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार होऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर शिंदे गटातील नेते नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. 

आता याबाबत आमदार बच्चू कडू यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये घेताना विश्वासात घेतले नाही. राष्ट्रवादीला सोबत घेण्यापूर्वी मंथन आणि चिंतन व्हायला पाहिजे होते.  राष्ट्रवादीला सरकारमध्ये सोबत घेतल्याने आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या सर्व आमदारांची अडचण झाली आहे. 

मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा त्रास होता, काम होत नव्हते. शिवसेनेचे मतदारसंघ फोडले जात होते, असा आरोप होता. मात्र आता ज्या नेत्यांवर शिंदे गटाकडून आरोप केले जायचे, त्याच नेत्यांना भाजपने जवळ केले आहे. यामुळे नक्कीच शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी आहे. या नाराजीचा स्फोट होऊ शकतो, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBacchu Kaduबच्चू कडूSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष