शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"अल्पमतात आहोत विरोधी बाकावर बसू ...", शरद पवारांचा दाखला देत आव्हाडांची फेसबुक पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 23:42 IST

Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 1995 साली शरद पवार हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली, त्यावेळेच्या प्रसंगाचा दाखला देत फेसबुक पोस्ट केली आहे.

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपसोबत हातमिळवणी करुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आता 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 1995 साली शरद पवार हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली, त्यावेळेच्या प्रसंगाचा दाखला देत फेसबुक पोस्ट केली आहे. तसेच, या पोस्टला "अल्पमतात आहोत विरोधी बाकावर बसू .." असे जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. 

फेसबुकद्वारे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत की, "1995 साली जेव्हा पहिल्यांदा युती सरकार विजयी झाले. म्हणजे पहिले बिगर काँग्रेस सरकार आले. तेव्हा आदरणीय शरद पवार साहेब हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. आणि ते मुख्यमंत्री असतानाच काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली. ते वर्षा बंगल्यावर राहत होते. त्यावेळेस मोबाईल नव्हते आणि बॅलेट पेपरवरती मोजणी चालू होती. त्यामुळे निकाल यायला उशीर लागत होते. निकाल जसजसे येत गेले तसे वर्षा बंगल्यावर उपस्थित असलेल्या सगळ्यांना जाणीव झाली की काँग्रेस बहुमत प्राप्त करू शकत नाही. ठरवलं असत तर बहुमत प्राप्तही करू शकली असती."

पुढे लिहिले आहे की, "पण, मला आठवतंय कि दुसऱ्याच दिवशी मी स्वतः वर्षा बंगल्यावर उपस्थित होतो निकाल लागण्यापासून ते मनोहर जोशी यांचा शपथविधी होईपर्यंत. साहेबांकडे गेलेले ज्येष्ठ नेते.. त्यांची नावे मी इथे लिहू इच्छित नाही. त्या सगळ्यांनी साहेबांना आग्रह करत होते कि साहेब सरकार बनवूया. आपण सरकार बनवू शकता. तेव्हा साहेबांच वाक्य होतं.. 'जनमत आपल्या विरोधात आहे. असं सरकार बनवणं योग्य नाही. त्यामुळे आपण विरोधी बाकावर बसायला हवं.' हे वाक्य त्यांचे म्हणजेच पवार साहेबांचे आहे आहे दिल्ली चा किंवा काँग्रेस हायकमांडचा काही ही संबंध नव्हता."

याचबरोबर, "मी ह्या सगळ्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे, साहेबांची राजकीय जीवनातली 60% वर्ष हि विरोधी बाकावर बसण्यात गेली आहेत. साहेब पहिल्यांदा 1967 ला निवडून आले तेव्हा पासून आज पर्यंत ते विधी मंडळाचे नाहीतर संसदेचे सदस्य आहेत. अर्धवट माहितीच्या आधारे महाराष्ट्राची दिशाभूल करणाऱ्यांसाठी मी हे लिहित आहे." असा टोला देखील जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना लगावला आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ