शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

“देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे; त्यांच्या शब्दावर माझा विश्वास”: जयंत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 15:48 IST

Pandharpur Mangalwedha Assembly Bypoll: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे नेते - जयंत पाटीलभाजपचा पराभव निश्चित - जयंत पाटीलशेतकरी आंदोलनाचा पश्चिम बंगालमध्ये परिणाम दिसेल - जयंत पाटील

पंढरपूर:पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या (Pandharpur Mangalwedha Assembly Bypoll) प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) आणि भाजपकडून समाधान आवताडे (Samadhan Autade) यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे नेते आहेत. त्यांच्या शब्दावर माझा विश्वास आहे, असे जयंत पाटील म्हणाले. (ncp leader jayant patil says that my faith on devendra fadnavis and their words)

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील (jayant patil) हे दोन्ही नेते पंढरपुरात आहेत. जयंत पाटील यांनी मेळाव्याला संबोधित करताना भाजपवर शेतकरी आंदोलन, निवडणुका यांवरून निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे नेते

देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी भालके यांना शब्द दिलाय की, उमेदवार देणार नाही, असे मला कोणीतरी सांगितले. ०३ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तोपर्यंत आपण काही बोलायचे नाही. चिंता करू नका. दिलेल्या शब्दाला जागणारे फडणवीस आहेत. आताच फडणवीस यांच्यावर अविश्वास दाखवणे योग्य ठरणार नाही, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला. 

राजकारणी आणि संपादक यांमध्ये गल्लत: बाळासाहेब थोरातांची संजय राऊतांवर टीका

भाजपचा पराभव निश्चित

सगळे घटक पक्ष एकत्र आले की, भाजपचा पराभव निश्चित होते. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तेव्हा सर्व घटकांचा भगीरथ भालके यांना आशीर्वाद आहे. काळजी करू नका. म्हणूनच कदाचित फडणवीस यांनी भालके यांना तसे सांगितले असावे, असे जयंत पाटील म्हणाले. 

पश्चिम बंगालमध्ये परिणाम दिसेल

चंद्रकांत पाटीलही पंढरपुरात आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणार असल्याचे ते म्हणाल्याचे समजले. तिथे दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करताय. त्यावर एकही शब्द अद्याप बोलला गेलेला नाही. शेकडो शेतकऱ्यांचा यादरम्यान मृत्यू झाला आहे. याचा परिणाम पश्चिम बंगालमधील निवडणुकीत दिसेल. भारतात जेव्हा जेव्हा सरकार, शेतकरी, मजूर, कामगार, कष्टकरी वर्गाच्या विरोधात जाते, तेव्हा तेव्हा सरकार उलथवून टाकल्याच्या घटना देशभरात घडल्या आहेत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

“सचिन वाझेंनी NIA ला असं काय सांगितलं की, शरद पवारांच्या पोटात दुखायला लागलं?”

पंढरपूरचा कार्यक्रम आम्ही करतो

शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय बाहेर पडू नका, असे आम्ही त्यांना आग्रहाने सांगितले आहे. इकडे नाही आलात, तरी चालेल. तुमचे निष्ठावंत सैनिक ताकदीने काम करतील. अजित पवार यांच्यापासून सर्वजण या मतदारसंघात येतील. शिवसेना आणि काँग्रेसचाही पाठिंबा आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही सांगितले आहे की, माझा पाठिंबा तुमच्यावतीने जाहीर करा. चांगल्या पद्धतीने निवडणूक यशस्वी करूया. सर्वजण मिळून भाजपचा पराभव करण्याचे काम आपण करू. अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर माझा विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भगीरथ भालकेंना तसे सांगितले असेल, तर ते अर्ज मागे घ्यायला लावतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :PandharpurपंढरपूरJayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटील