शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

रोज रोज लोकांना डिवचण्याचं काम...; संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी छगन भुजबळ काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 13:09 IST

पोलिसांनी त्यांचे काम चोख करायला हवे असं मत त्यांनी व्यक्त केले आहे.

नाशिक - मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. विधानसभेतही भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांनी हा मुद्दा सभागृहात आणला होता. या प्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी मनसेकडूनही केली जात आहे. त्याचसोबत या प्रकारामुळे मनसे-ठाकरे गटात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यातच छगन भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ म्हणतात की, महाराष्ट्रात असे प्रकार होऊ नयेत आणि मुद्दामाहून रोज रोज लोकांना डिवचण्याचं कामसुद्धा होऊ नये. दोन्ही गोष्टींनी संयम पाळायला पाहिजे आणि पोलिसांनी त्यांचे काम चोख करायला हवे असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

उद्धव ठाकरेंच्या सभेला गर्दी होईलरत्नागिरीत खेड तालुक्यात आज उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेला निश्चितपणे गर्दी जमेल. शिवसेना उभी राहण्यात कोकणच्या लोकांचा मोठा वाटा आहे. कोकणातील अनेक लोक नगरसेवक, आमदार, खासदार झाले. शिवसेनेचे नेते दुसरीकडे गेले तरी मतदार आणि कार्यकर्ते हलत नाहीत असा अनुभव आहे. उद्धव ठाकरे यांना लोकांची सहानुभूती मिळतेय हे स्पष्ट आहे. त्यामुळेच अमरावती, नागपूर, कसबा येथे महाविकास आघाडीला विजय मिळाला असंही छगन भुजबळ यांनी सांगितले. 

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापरकेंद्रीय तपास यंत्रणांचे सर्रासपणे अतिरेक सुरू आहे. सर्वच ठिकाणी गैरवापर होत आहे हे सगळेच उघड आहे. लोकांनी निवडून दिलेले सरकार असलं तरी काहीतरी खुसपट काढून अटक वैगेरे सत्र सुरू ठेवायचे. महाराष्ट्रात आम्ही अनुभव घेतलाय. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांनादेखील हा अनुभव येत आहे असा टोला छगन भुजबळांनी भाजपाला लगावला. 

कांद्यामुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थितीकांदा दरामुळे सध्या अतिशय वाईट परिस्थिती सुरू आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही विधानमंडळात आवाज उठवत आहोत. कधी कधी नाफेड देखील व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करतो. व्यापारी दोनशे तीनशे रुपयांनी घेतो आणि नाफेडला पाचशे रुपयांनी देतो त्यामुळे नाफेडने थेट बाजार समितीत जाऊन कांदा खरेदी केला पाहिजे. म्हणजे व्यापारी देखील भाव वाढवतील. बाहेरून खरेदी करून काही उपयोग नाही. नाफेडची जी आकडेवारी सांगितली जाते, ती चुकीची आहे. यावर विधानसभेत पुन्हा बोलू असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळSandeep Deshpandeसंदीप देशपांडेBJPभाजपा