शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

बारामतीत शरद पवारांबद्दल 'ते' वक्तव्य; चहुबाजूने टीका झाल्यावर अजित पवारांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 18:13 IST

अजित पवार यांनी काल बारामतीत शरद पवारांवर निशाणा साधल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी टोकदार टीका केली होती.

NCP Ajit Pawar Vs Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामती इथं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना केलेल्या एका वक्तव्याची राज्यभर मोठी चर्चा झाली. "आगामी लोकसभा निवडणुकीत ही आमची शेवटचीच निवडणूक आहे, असं सांगून काही लोकं तुम्हाला भावनिक करतील. पण खरंच कधी शेवटची निवडणूक आहे, हे मला माहीत नाही. परंतु तुम्ही भावनिक होऊ नका," असं म्हणत अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत मी देईल त्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं. आपल्या वक्तव्यातून शरद पवार यांच्यावर निशाणा साधणाऱ्या अजित पवार यांच्याविरोधात कालपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आक्रमक झाले. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेत्यांनी अजित पवार हे शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहात आहेत का? असा घणाघाती सवाल विचारत टीकास्त्र सोडलं. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी काल केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत टीकाकारांवरही पलटवार केला आहे.

बारामतीत केलेल्या वक्तव्यावर खुलासा करताना अजित पवार म्हणाले की, "काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे," अशी पोस्ट अजित पवार यांनी त्यांच्या 'एक्स' हँडलवर लिहिली आहे.

जितेंद्र आव्हाडांनी घेतला होता खरपूस समाचार

अजित पवार यांनी काल शरद पवारांवर निशाणा साधल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी टोकदार टीका केली होती. "अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघत आहेत. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता. काकीचे कुंकू कधी पुसले जाईल याची तुम्ही वाट पाहताय, तुमच्यासोबत काम केल्याची आता लाज वाटत आहे. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले, तिचे कुंकू कधी पुसले जाईल याची आज तुम्ही वाट बघत आहात. असले घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते. ही महाराष्ट्राची आणि बारातमीची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल,' असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड