शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आव्हाडांकडून हसन मुश्रीफांचा एकेरी उल्लेख; अजित पवार गटाचा जोरदार पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 11:20 IST

जितेेंद्र आव्हाडांच्या टीकेला अजित पवार गटाकडून ठाण्यातील नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Jitendra Awhad NCP ( Marathi News ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटामध्ये राजकीय संघर्ष सुरू असून दिवसेंदिवस हा संघर्ष टोक गाठत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. नुकतंच आव्हाड यांनी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघाती टीका केली होती. या टीकेला अजित पवार गटाकडून ठाण्यातील नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

"राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एकेरी भाषेत टीका केली. आव्हाड यांची ही संस्कृती आहे. अनेकदा ते एकेरी भाषेत टीका करून लोकांचा अपमान करत असतात. मात्र हसन मुश्रीफ हे कोल्हापूरच्या लाल मातीतून येतात, पैलवानही आहेत. ते कधी तुम्हाला राजकारणात चितपट करतील, हे तुम्हाला कळणारही नाही," असा पलटवार आनंद परांजपे यांनी केला आहे. 

५३ आमदारांच्या पत्रावरूनही खोचक टोला

भाजपला समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांनी सह्यांचं पत्र दिलं होतं. मात्र अजित पवारांच्या दबावात मी सही केली आणि नंतर बाहेर येऊन जयंत पाटील यांना सांगितलं की, माझी सही ग्राह्य धरू नका, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. या दाव्यावरूनही आनंद परांजपे यांनी आव्हाडांवर निशाणा साधला. "तुम्ही कोणी लहान मूल होतात का? तुमच्या हात धरून कोणी जबरदस्तीने ती सही घेतली होती का?" असा सवाल परांजपे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, आनंद परांजपे यांनी केलेल्या या टीकेवर जितेंद्र आव्हाड काही भाष्य करतात का,  हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडHasan Mushrifहसन मुश्रीफAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस