शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यावर अमित शाहांना हसू आवलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
2
IND vs SA 2nd Test : पंतनही गमावला टॉस! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
3
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
4
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
5
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
6
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
7
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
8
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
9
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
10
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
11
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
12
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
13
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
14
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
15
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
16
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
17
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
18
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
19
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “आम्ही पुन्हा येऊ यात शंकाच नाही, कधी येणार याचा मुहूर्तही सांगू”; राष्ट्रवादी प्रचंड आशावादी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 13:14 IST

Maharashtra Political Crisis: वेगळ्या मार्गाने आलेले सरकार किती काळ टिकेल, याबाबत जनतेच्या मनात शंका आहे, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन होऊन महिना उलटायला आला, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेकडून सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्ही पुन्हा सत्तेत येऊ यात शंका नाही, कधी येणार त्याचा मुहूर्तही सांगू, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत सूतोवाच केले आहे. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ यात काही शंका नाही. कधी येणार याचा मुहूर्त थोड्या दिवसात सांगू. पण आमचेच सरकार पुन्हा येणार आहे. राजकारणात बंडखोरी आणि पक्षांतराची नवी फॅशन आली आहे. अधिकृत पक्षातून निवडून आलेले उमेदवार दुसऱ्या पक्षात जात असतील, तर ती एक प्रकारची राजकीय आत्महत्याच आहे, या शब्दांत जयंत पाटील यांनी राजकीय घडामोडींचा खरपूस समाचार घेतला. 

नवा पायंडा पुढच्या दहा वर्षांत पडेल

कुठल्याही राजकीय पक्षाने निवडणुकीला सामोरे न जाता तुम्ही फक्त निवडून यायचे. मग तुम्हाला ताब्यात घेऊ. त्याची काय किंमत असेल ती मोजू, अशी फॅशन देशात रूढ होण्याची शक्यता आहे. गावोगावी फिरा, प्रचार करा यापेक्षा सर्वांना निवडून येऊ द्यावं आणि त्यानंतर त्या सर्वांना गोळा करावे हाही नवा पायंडा पुढच्या दहा वर्षांत पडेल, असा जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना लगावला. वेगळ्या मार्गाने आलेले सरकार किती काळ टिकेल याबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शंका आहे, असा दावाही जयंत पाटील यांनी केला. 

...तर लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहील

निवडून आलेले अधिकृत पक्षातील लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात जात असतील ही काही प्रमाणात राजकीय आत्महत्याच आहे. घटनेतील १०व्या परिशिष्टानुसार अपात्रतेचा जो कायदा आहे त्याचे उल्लंघन झाले आहे. गट करण्याआधीच त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुरू झाली आहे. दहाव्या परिशिष्टानुसार न्यायालयाने निर्णय दिला तर लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहील, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे सरकार येऊन जास्त कालावधी झाला आहे. या वेळात केवळ दिल्लीवाऱ्या करणे, शिवसेनेच्या फुटीर गटातील मतभेद मिटवणे, त्यांच्या समजुती घालणे यात मुख्यमंत्र्यांचा वेळ जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद घ्यावे लागल्याने भाजप निराश असल्याने त्यांना राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगर पंचायतींमधील ओबीसी आरक्षणाकडे लक्ष देण्यास नव्या सरकारला वेळ मिळाला नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस