शहरं
Join us  
Trending Stories
1
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
2
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
3
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
8
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
11
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
13
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
14
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
15
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

Maharashtra Political Crisis: “आम्ही पुन्हा येऊ यात शंकाच नाही, कधी येणार याचा मुहूर्तही सांगू”; राष्ट्रवादी प्रचंड आशावादी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 13:14 IST

Maharashtra Political Crisis: वेगळ्या मार्गाने आलेले सरकार किती काळ टिकेल, याबाबत जनतेच्या मनात शंका आहे, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन होऊन महिना उलटायला आला, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेकडून सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्ही पुन्हा सत्तेत येऊ यात शंका नाही, कधी येणार त्याचा मुहूर्तही सांगू, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत सूतोवाच केले आहे. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ यात काही शंका नाही. कधी येणार याचा मुहूर्त थोड्या दिवसात सांगू. पण आमचेच सरकार पुन्हा येणार आहे. राजकारणात बंडखोरी आणि पक्षांतराची नवी फॅशन आली आहे. अधिकृत पक्षातून निवडून आलेले उमेदवार दुसऱ्या पक्षात जात असतील, तर ती एक प्रकारची राजकीय आत्महत्याच आहे, या शब्दांत जयंत पाटील यांनी राजकीय घडामोडींचा खरपूस समाचार घेतला. 

नवा पायंडा पुढच्या दहा वर्षांत पडेल

कुठल्याही राजकीय पक्षाने निवडणुकीला सामोरे न जाता तुम्ही फक्त निवडून यायचे. मग तुम्हाला ताब्यात घेऊ. त्याची काय किंमत असेल ती मोजू, अशी फॅशन देशात रूढ होण्याची शक्यता आहे. गावोगावी फिरा, प्रचार करा यापेक्षा सर्वांना निवडून येऊ द्यावं आणि त्यानंतर त्या सर्वांना गोळा करावे हाही नवा पायंडा पुढच्या दहा वर्षांत पडेल, असा जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना लगावला. वेगळ्या मार्गाने आलेले सरकार किती काळ टिकेल याबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शंका आहे, असा दावाही जयंत पाटील यांनी केला. 

...तर लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहील

निवडून आलेले अधिकृत पक्षातील लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात जात असतील ही काही प्रमाणात राजकीय आत्महत्याच आहे. घटनेतील १०व्या परिशिष्टानुसार अपात्रतेचा जो कायदा आहे त्याचे उल्लंघन झाले आहे. गट करण्याआधीच त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुरू झाली आहे. दहाव्या परिशिष्टानुसार न्यायालयाने निर्णय दिला तर लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहील, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे सरकार येऊन जास्त कालावधी झाला आहे. या वेळात केवळ दिल्लीवाऱ्या करणे, शिवसेनेच्या फुटीर गटातील मतभेद मिटवणे, त्यांच्या समजुती घालणे यात मुख्यमंत्र्यांचा वेळ जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद घ्यावे लागल्याने भाजप निराश असल्याने त्यांना राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगर पंचायतींमधील ओबीसी आरक्षणाकडे लक्ष देण्यास नव्या सरकारला वेळ मिळाला नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस