शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विधानसभेला मविआकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? जयंत पाटलांचे सकारात्मक भाष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 19:49 IST

Jayant Patil News: महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी फार चांगले काम केले, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Jayant Patil News: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विविध मुद्द्यांवरून विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. तसेच विधिमंडळातील विविध नेत्यांच्या भेटी-गाठीही चर्चेच्या विषय ठरल्या. यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत संजय राऊतांनी केलेल्या एका विधानावर महाविकास आघाडी तसेच महायुतीचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी याबाबत सकारात्मक भाष्य केल्याची चर्चा सुरू आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला पाहिजे. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणे धोका आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून राज्याने उद्धव ठाकरेंचे काम पाहिले आहे. लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनही झालेले आहे. अर्थातच तिघांचीही ताकद एकत्र होती. बिन चेहऱ्याचे सरकार, हे अजिबात चालणार नाही. लोक ते स्वीकारणार नाहीत. लोकांना चेहरा द्यावाच लागेल, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. यावरून आता जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी फार चांगले काम केले

मुख्यमंत्रिपदाबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत बसून चर्चा करून निर्णय होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. प्रत्येक पक्ष त्यांच्याकडून एखादे नाव पुढे करू शकतो. त्यावर बसून चर्चा होईल. महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते त्यावर बसून चर्चा करतील आणि निर्णय घेतील. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास ते आमच्या सरकारचे प्रमुख होते. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार असताना उद्धव ठाकरे त्या सरकारचे मुख्यमंत्री होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी फार चांगले काम केले, असे जयंत पाटील म्हणाले. 

दरम्यान, या संदर्भातील निर्णय एकत्र बसून घेऊ. मविआच्या बैठकीत जो काही फॉर्म्युला ठरेल तो अंतिम असणार आहे. संजय राऊत यांचे वैयक्तिक मत असेल. महाविकास आघाडी चर्चा करुन काय ते ठरवेल, असे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तर, ही लढाई मुख्यमंत्रीपदाची नाही. ही लढाई स्वाभिमानाची आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीSanjay Rautसंजय राऊत