शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

“लस महोत्सव नक्की करु, पण आधी पुरवठा करा आणि शक्य नसेल तर...”; जयंत पाटील आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 17:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अधिकाधिक लसीकरण (Corona Vaccination) करण्यासाठी ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे.

ठळक मुद्देजयंत पाटील यांचे कोरोना लसीकरणावरून केंद्रावर टीकास्त्रपंतप्रधान मोदींकडून लस महोत्सवाचे आवाहनकेंद्र सरकार नियोजन करण्यात अपयशी - पाटील

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव युद्धपातळीवर रोखण्यासाठी पुढील दोन ते तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले आहे. पात्र लाभार्थ्यांचे अधिकाधिक लसीकरण (Corona Vaccination) करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, यावरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. (jayant patil react over pm narendra modi corona vaccination drive)

राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र बंद करावी लागली आहेत. काही ठिकाणी कोरोना लस तुटवडा प्रचंड प्रमाणात निर्माण झाला आहे. यावरून जयंत पाटील निशाणा साधत म्हणाले की, लस वाटप नियंत्रण केंद्राच्या हातात आहे. मात्र केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयश दिसत आहे.

कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार? राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

लस महोत्सव नक्की करु, पण...

पंतप्रधाननरेंद्र मोदींनी यांनी देशात चार दिवस लसीकरण महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. लस महोत्सव साजरा करण्यासाठी लस उपलब्ध होण्याची गरज आहे. आम्ही महोत्वस करू. पण आधी तर लस द्या. लस पुरवठा करणे शक्य नसेल, तर लस महोत्सवाची वेळ बदला, असे जयंत पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्राची कोरोना लसींची मागणी सुमारे ४० ते ५० लाख होती. मात्र, केंद्राकडून फक्त साडे सतरा लाख लसी आल्या. या लसी लगेच संपतील, असेही ते म्हणाले.

संभाजी भिडे गुरुजींच्या विधानावर उदयनराजे आक्रमक; म्हणाले...

केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयशी

कोरोना लस वाटप हे केंद्राच्या हातात आहे. केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी जे जे सांगितले ते ते देश करायला तयार आहे. त्यांनी थाळी वाजवायला सांगितली, आम्ही तेही केले. त्यावर टीका केली नाही. पण, आता देशात कोरोना लसीचा फक्त पुरवठा झाला पाहिजे. आम्ही लस महोत्सवही करू, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करतंय; विखे-पाटील आक्रमक 

दरम्यान, देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असतानाही लसीच्या पुरवठ्याबाबत दुजाभाव का कशासाठी? राज्यात केवळ साडेसात लाख लसीचे डोस पुरवण्यात आले. पण इतर राज्यांना ४० लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. यात राजकारणाचा मुद्दा नाही. पण ज्या पद्धतीने पुरवठा केला जात आहे ते योग्य नाही. दर आठवड्याला आम्हाला ४० लाख डोसेस द्या त्यापेक्षा अधिक आमची काहीच मागणी नाही, असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण