शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

एरंडोलमध्ये पुन्हा विजय मिळवणे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 2:37 PM

जळगाव जिल्ह्यात युती भक्कम मानली जाते, १९९९ ते २००९ पर्यंत एरंडोल मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता.

मुंबई - विधानसभा निवडणुकीला जेमतेम दीड-दोन महिन्यांचा कालवधी उरला असताना सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. जळगाव जिल्ह्यात मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसलाएरंडोल एकमेव मतदारसंघात विजय मिळवता आला होता.  जळगाव जिल्ह्यातील भाजपची आणि शिवसेनेची  ताकद वाढत आहे. त्यामुळे  एरंडोल मतदारसंघात पुन्हा विजय मिळवणे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.

युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आपली ताकद वाढवली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील संख्याबळ ५ वरून १ वर आले होते. एकमेव एरंडोल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील हे अतिशय कमी मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यामुळे आहे ती जागा टिकविण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे.

एरंडोल मतदारसंघात १९६२ नंतर काँग्रेसला ५ वेळा तर शिवसेनेला ४ वेळा विजया मिळवता आला आहे. इतर २ तर राष्ट्रवादीला २०१४ मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी विजय मिळवता आला होता. त्यावेळी शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्यात मुख्य लढत झाली होती. तर आमदार सतीश पाटील अवघे १ हजार ९८३ मतांनी निवडून आले होते. विशेष म्हणजे २०१४ मध्ये  भाजप- शिवसेना वेगवेगळे लढले होते.

जळगाव जिल्ह्यात युती भक्कम मानली जाते, १९९९ ते २००९ पर्यंत एरंडोल मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. २०१४ मध्ये सुद्धा सेनेचे उमदेवार चिमणराव पाटील यांना अतिशय कमी मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता.  मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये झालेली गटबाजी आणि युतीची वाढती ताकद यामुळे, एरंडोल मतदारसंघात पुन्हा विजय मिळवणे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.