शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

"राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच, हे निवडणूक आयोगानेही दाखवलं"; आव्हाड असं नेमकं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 20:38 IST

शरद पवार समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत आता निवडणूक आयोगानेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच असल्याचं दाखवून दिलं असल्याचं म्हटलं आहे.

Jitendra Awhad ( Marathi News ) : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल काल निवडणूक आयोगाने दिल्यानंतर आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला नवीन नाव देण्यात आलं आहे. पवार गटाने सुचवलेल्या तीन नावांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब करत निवडणूक आयोगाने त्यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार हे नाव वापरण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत आता निवडणूक आयोगानेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच असल्याचं दाखवून दिलं असल्याचं म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "अखेर सत्य समोर आलेच. निवडणूक आयोगानेही नाव देताना कळत- न कळत हे दाखवून दिले की, एनसीपी ही शरद पवार साहेबांचीच आहे. म्हणून आम्हाला नाव मिळालं, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार'. हेच खरे जन्मदाते होते पक्षाचे. पण, काही पाकीटमारांनी घड्याळ चोरलं. पण, त्यांच्या दुर्दैवाने मनगट आमच्याकडेच राहिले. लढाईत नेहमी मनगटच कामी येत असतं. शरद पवार आमचे मनगट अन् त्यात असलेला जोर पुन्हा एकदा महाराष्ट्रात जादू करेल. आता त्यांनी नाव घ्यावे, एनसीपी - अलिबाबा आणि चाळीस चोर," असा टोलाही आव्हाड यांनी लगावला आहे.

जयंत पाटील यांच्याकडून कार्यकर्त्यांना दिलासा

शरद पवारांच्या पक्षाला नवीन नावासह आणि चिन्हासह निवडणुकीला सामोरं जावं लागणार असल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिलासा देत म्हटलं आहे की, "जनता जाणती आहे, फक्त चिन्हावरून नाही तर नाव आणि व्यक्तीच्या कार्यावरून पक्ष ओळखते म्हणूनच चिन्हाची भीती बाळगू नका," असा दिलासा जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना दिला.

दरम्यान, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार साहेब आणि पवार साहेब म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे गेल्या तीन दशकांपासून जनतेच्या मनावर कोरले गेलेलं समीकरण आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' या नावामागे असलेला पुरोगामी विचार महाराष्ट्रातील घराघरात रुजवण्यासाठी नव्या जोमाने संघर्ष करू, पुन्हा लढू आणि पुन्हा जिंकू," असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार