शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “शिवसेना फोडण्यामागे भाजपच, भविष्यात मुंबईसह महाराष्ट्र विकून टाकेल हे निर्विवाद सत्य”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 14:55 IST

Maharashtra Political Crisis: मुंबईतील मराठी माणूस टिकण्यासाठी शिवसेनेला तळागाळातील माणसाने ताकद देणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. यातच आता महाविकास आघाडीतील अन्य पक्षही शिवसेनेच्या पाठिशी असल्याचे सांगितले जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना फोडण्यामागे भाजपच असल्याचा मोठा आरोप राष्ट्रवादी नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. 

ठाकरे सरकार कोसळल्यापासून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. गुवाहाटी, सुरत, गोव्याला राहायला पैसे आहेत. दिल्लीच्या वाऱ्या करायला पैसे आहेत, ३ स्टार ५ स्टार हॉटेलमध्ये खानावळी उठवायला पैसे आहेत. मात्र, पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी  मदत जाहीर करायला पैसे नाहीत. वाह रे निर्लज्ज सरकार, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

शिवसेना फोडण्यामागे भाजपच

शिवसेना फोडण्यामागे भाजपचाच हात. महाराष्ट्रातील व विशेषत: मुंबईतील मराठी माणूस टिकण्याकरिता शिवसेना पक्षाला तळागाळातील मराठी माणसाने ताकद देणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. अन्यथा भाजप नावाचा पक्ष भविष्यात मुंबईसह महाराष्ट्र विकून टाकेल हे निर्विवाद सत्य आहे, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. याशिवाय, अमोल मिटकरी यांनी सपोर्ट शिवसेना असा हॅशटॅगही दिला आहे. 

दरम्यान, शिंदे-फडणवीस हे दीड दोन महिन्याचे मंत्री आहेत. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.  मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. आगामी काळात भाजपच्या नेत्यांमध्ये मंत्रिपदासाठी मारामाऱ्या होतील, असे भाकीत अमोल मिटकरी यांनी केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या बद्दल व्यक्त केलेल्या मताशी आपण सहमत आहोत. पुरंदरेंनी साहित्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची जेवढी बदनामी केली तेवढी कोणीच केली नाही, असेही यावेळी मिटकरी म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAmol Mitkariअमोल मिटकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा