शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
3
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
4
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
5
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
6
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
7
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
8
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
9
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
10
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
11
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
12
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
13
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
14
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
15
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
16
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
17
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
18
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
19
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
20
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)

Maharashtra Political Crisis: “शिवसेना फोडण्यामागे भाजपच, भविष्यात मुंबईसह महाराष्ट्र विकून टाकेल हे निर्विवाद सत्य”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 14:55 IST

Maharashtra Political Crisis: मुंबईतील मराठी माणूस टिकण्यासाठी शिवसेनेला तळागाळातील माणसाने ताकद देणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. यातच आता महाविकास आघाडीतील अन्य पक्षही शिवसेनेच्या पाठिशी असल्याचे सांगितले जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना फोडण्यामागे भाजपच असल्याचा मोठा आरोप राष्ट्रवादी नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. 

ठाकरे सरकार कोसळल्यापासून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. गुवाहाटी, सुरत, गोव्याला राहायला पैसे आहेत. दिल्लीच्या वाऱ्या करायला पैसे आहेत, ३ स्टार ५ स्टार हॉटेलमध्ये खानावळी उठवायला पैसे आहेत. मात्र, पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी  मदत जाहीर करायला पैसे नाहीत. वाह रे निर्लज्ज सरकार, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

शिवसेना फोडण्यामागे भाजपच

शिवसेना फोडण्यामागे भाजपचाच हात. महाराष्ट्रातील व विशेषत: मुंबईतील मराठी माणूस टिकण्याकरिता शिवसेना पक्षाला तळागाळातील मराठी माणसाने ताकद देणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. अन्यथा भाजप नावाचा पक्ष भविष्यात मुंबईसह महाराष्ट्र विकून टाकेल हे निर्विवाद सत्य आहे, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. याशिवाय, अमोल मिटकरी यांनी सपोर्ट शिवसेना असा हॅशटॅगही दिला आहे. 

दरम्यान, शिंदे-फडणवीस हे दीड दोन महिन्याचे मंत्री आहेत. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.  मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. आगामी काळात भाजपच्या नेत्यांमध्ये मंत्रिपदासाठी मारामाऱ्या होतील, असे भाकीत अमोल मिटकरी यांनी केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या बद्दल व्यक्त केलेल्या मताशी आपण सहमत आहोत. पुरंदरेंनी साहित्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची जेवढी बदनामी केली तेवढी कोणीच केली नाही, असेही यावेळी मिटकरी म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAmol Mitkariअमोल मिटकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा