शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

Maharashtra Political Crisis: “शिवसेना फोडण्यामागे भाजपच, भविष्यात मुंबईसह महाराष्ट्र विकून टाकेल हे निर्विवाद सत्य”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 14:55 IST

Maharashtra Political Crisis: मुंबईतील मराठी माणूस टिकण्यासाठी शिवसेनेला तळागाळातील माणसाने ताकद देणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. यातच आता महाविकास आघाडीतील अन्य पक्षही शिवसेनेच्या पाठिशी असल्याचे सांगितले जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना फोडण्यामागे भाजपच असल्याचा मोठा आरोप राष्ट्रवादी नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. 

ठाकरे सरकार कोसळल्यापासून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. गुवाहाटी, सुरत, गोव्याला राहायला पैसे आहेत. दिल्लीच्या वाऱ्या करायला पैसे आहेत, ३ स्टार ५ स्टार हॉटेलमध्ये खानावळी उठवायला पैसे आहेत. मात्र, पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी  मदत जाहीर करायला पैसे नाहीत. वाह रे निर्लज्ज सरकार, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

शिवसेना फोडण्यामागे भाजपच

शिवसेना फोडण्यामागे भाजपचाच हात. महाराष्ट्रातील व विशेषत: मुंबईतील मराठी माणूस टिकण्याकरिता शिवसेना पक्षाला तळागाळातील मराठी माणसाने ताकद देणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. अन्यथा भाजप नावाचा पक्ष भविष्यात मुंबईसह महाराष्ट्र विकून टाकेल हे निर्विवाद सत्य आहे, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. याशिवाय, अमोल मिटकरी यांनी सपोर्ट शिवसेना असा हॅशटॅगही दिला आहे. 

दरम्यान, शिंदे-फडणवीस हे दीड दोन महिन्याचे मंत्री आहेत. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.  मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. आगामी काळात भाजपच्या नेत्यांमध्ये मंत्रिपदासाठी मारामाऱ्या होतील, असे भाकीत अमोल मिटकरी यांनी केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या बद्दल व्यक्त केलेल्या मताशी आपण सहमत आहोत. पुरंदरेंनी साहित्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची जेवढी बदनामी केली तेवढी कोणीच केली नाही, असेही यावेळी मिटकरी म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAmol Mitkariअमोल मिटकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा