शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

Maharashtra Political Crisis: “१०६ हुतात्म्यांनी मुंबई गुजरातला जाऊ दिली नाही, १०६ जण ती जावी म्हणून दिवस-रात्र झटतायत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 11:40 IST

Maharashtra Political Crisis: मनाला पटतंय बघा, असे सांगत अमोल मिटकरी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. हे नवे सरकार ज्या पद्धतीने स्थापन झाले आहे, त्यावरून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी टीकास्त्र सोडले. यातच आता पुन्हा एकदा मुंबई गुजरातला नेण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. 

एका ट्विटमध्ये संयुक्त महाराष्ट्रावेळी हौतात्म्य पत्करलेल्यांचे स्मरण करत त्याचा संबंध आताच्या राजकारणाशी जोडला आहे. त्यातून मुंबई गुजरातला नेण्यासंदर्भात भाजपवर आरोप केले आहेत. या ट्विटमध्ये अमोल मिटकरी म्हणतात, १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन मुंबई गुजरातला जाऊ दिली नाही! १०६ जण आता तीच मुंबई गुजरातला मिळवून देण्यासाठी दिवस-रात्र झटत आहे! असे म्हटले आहे.

मनाला पटतय बघा...

या ट्विटला अमोल मिटकरी यांनी, मनाला पटतंय बघा, असे कॅप्शनही दिले आहे. यापूर्वी अमोल मिटकरी यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून खोचक शब्दांत टीका केली होती. यामध्ये, कोरोनानंतरच्या काळात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलपती म्हणून दीक्षांत समारंभाला आपण स्वतः हजर राहत आहात. विद्यापीठ सदस्य म्हणून आपणास भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मानित करताना आनंद होत असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. 

आपण अनेकदा घटनाबाह्य वागलात

आपल्या देशातील लोकशाही, समता, स्वातंत्र्य व बंधुता ही मूल्य संविधानात आहेत. पी. सी. अलेक्झांडर हे लोकांचे राज्यपाल म्हणून महाराष्ट्राच्या जनतेस आजही स्मरणात आहेत. आपण शिवप्रेमी आहात. संविधान प्रेमी असाल, याबाबत मी तरी आशावाद आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण अनेकदा घटनाबाह्यच वागलात, असे मत विविध घटनातज्ज्ञांनी व्यक्त केले. मग घाईघाईत केलेली फ्लोअर टेस्ट, राजकारण्यांना भरवलेले पेढे, १२ आमदारांची प्रलंबित यादी यामुळे आपली भूमिका वारंवार संशयाच्या भोवऱ्यात येत होती. तरीही आपण संविधानाचा सन्मान करत असाल, याबाबत मला शंका नाही, असे मिटकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण

आपण शिवनेरी व रायगड स्वतः चढून गेलात, हा प्रत्येक माणसासाठी अभिमानाचा क्षण होता. छत्रपती शिवरायांचाच विचार भारतीय राज्यघटनेत आला आहे. तिचे पालन व संरक्षण आपण निश्चितच करावे, या अपेक्षेपोटी आपणास ही संविधानाची प्रत देताना आनंद होत आहे. आपणास नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा, असे सांगत अमोल मिटकरी यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAmol Mitkariअमोल मिटकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस