शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

“शिवसेना सोडून राज ठाकरेंनी चूक केली, बाळासाहेबांसोबत रक्ताचे नाते, तरीही...”: छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 14:58 IST

Chhagan Bhujbal Criticized Raj Thackeray: राज ठाकरेंनी वेगळे व्हायचे कारण काय? तुमची काय मागणी होती सांगा लोकांना, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Chhagan Bhujbal Criticized Raj Thackeray: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ सातत्याने चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येछगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात आहेत. अशातच आता छगन भुजबळ यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना ज्या माणसाने अटक केली, त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले, अशा आशयाचे विधान राज ठाकरे यांनी केले होते. याला आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिले. माझ्यासमोर जी फाईल आली ती फाईल होम डिपार्टमेंट म्हणून माझ्याकडे आली. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हा आम्ही सांगितले होते की, श्रीकृष्ण कमिटीचा जो अहवाल आहे, त्याची आम्ही अंमलबजावणी करु. त्यानंतर कारवाई केली होती. माझ्यापुढे तेव्हा मार्गच नव्हता, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

शिवसेना सोडून राज ठाकरेंनी चूक केली

राज ठाकरेंनी मनसे पक्ष काढला. शिवसेना सोडून त्यांनी चूक केली. एकमेकांवर टीका झाली. शिवसेना आणि राज ठाकरेंवर किती टीका टिपण्णी झाली. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा दोघांना फोन केला आणि सांगितले की, पाच ते सहा दिवस एकमेकांविरोधात काहीही बोलू नका. राग हा त्या क्षणापुरता असतो, राग शांत झाला की मन बदलते. दोघांनीही ऐकले पण मतभेद झाले आणि राज ठाकरेंनी त्यांचा निर्णय घेतला, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ते टीव्ही९ शी बोलत होते.

दरम्यान, राज ठाकरेंना विचारु इच्छितो की, राज ठाकरे लहान होते, तेव्हा शाळेतून आले नाहीत की, बाळासाहेब आणि माँ विचारायच्या राजा का आला नाही? राज ठाकरे घरी आल्याशिवाय माँ आणि बाळासाहेब जेवत नव्हते. तुमचे रक्ताचे नाते आहे. माझे आणि बाळासाहेबांचे तर मतभेद झाले. मंडल आयोग किंवा इतर कशावरुन. पण राज ठाकरेंचे काय? तुमचे मतभेद कशावरुन झाले? मतभेद झाले तरीही तुम्ही हे लक्षात घ्यायचे होते की शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. मग तुम्ही वेगळे व्हायचे कारण काय? तुमची काय मागणी होती सांगा लोकांना. मतभेद होते तरीही सांभाळून घ्यायला नकोत? अशी विचारणा छगन भुजबळ यांनी केली. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस