शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 15:02 IST

Chhagan Bhujbal Reaction On Manoj Jarange Maratha Morcha In Mumbai: मराठा समाजाला आरक्षण द्यायचे होते, ते दिलेले आहे. कुणबी प्रमाणपत्र द्यायची होती, ती दिली. आणखी काय पाहिजे, अशी विचारणा छगन भुजबळ यांनी केली.

Chhagan Bhujbal Reaction On Manoj Jarange Maratha Morcha In Mumbai: मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर ते प्रत्येक जिल्ह्यात समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची तयारी करीत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा तरुण मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. मराठ्यांची पोरे आता थांबणार नाहीत. आरक्षण घेतल्याशिवाय कुणाचेही ऐकणार नाहीत, अशी मनःस्थिती समाजाची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे, आम्ही मुंबईला येत नाही, आरक्षण जाहीर केले तर आम्ही मुंबईला जाणार नाही. उगीचच आम्ही कुणाला टार्गेट का करू, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी खोचक शब्दांत टीका केली.

पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, कोण अडवत आहे तुला. जालन्यात कर, अंतरवाली सरटीत कर, मुंबईत कर, दिल्लीत कर, देशात लोकशाही आहे, कुठेही आंदोलन करू शकतो. परंतु, ज्या संविधानाने तुम्हाला अशा प्रकारचा अधिकार दिलेला आहे. उपोषण करण्याचा, लोक जमवण्याचा, भाषण करण्याचा, त्या संविधानाने हे सुद्धा सांगितलेले आहे की, जे वेगवेगळे घटक आहेत, त्यांनी एकमेकांवर कुरघोडी करता कामा नये. तेवढे लक्षात ठेवावे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे

मराठा समाजाला आरक्षण द्यायचे होते, ते दिलेले आहे. तेलंगणाच्या काही भागातील लोक आहेत, जी कुणबी प्रमाणपत्र द्यायची होती, ती दिली. आणखी काय पाहिजे, अशी विचारणा करत, प्रत्येक घटक जो आहे, तो आपापल्या गोष्टी सांभाळत आहे. दलित समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न केला, तर ते गप्प बसणार का, आदिवासी समाज गप्प बसेल का, तर नाही. ओबीसी समाजही गप्प बसणार नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, सुरज चव्हाण यांच्या नियुक्तीबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, माझ्यासमोर सुरत चव्हाण यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. त्याने अनेक वर्ष पक्षात काम केले आहे, त्यांची चूक झाली, त्याची माफी मागितली आहे. काही कारणामुळे त्यांना महत्त्वाच्या पदावरून दूर करणे किंवा त्यांना शिक्षा देणे, कायमस्वरूपी लांब ठेवणे हे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील