शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

"नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 19:27 IST

Nanded Loksabha Election: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह हे नांदेडला आले होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसवर जोरदार टीका केली. 

नांदेड - Amit Shah on Mahavikas Aghadi ( Marathi News ) राहुल गांधींच्या नेतृत्वात ३ पक्ष एकत्र झालेत. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि एक अर्धवट उरलेली काँग्रेस पक्ष, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी दोघांनी काँग्रेसला अर्धे केले. तीन तिघाडा, काम बिघाडा हे तिघे महाराष्ट्राचं भलं करू शकतात का? निवडणुकीनंतर हे तिन्ही पक्ष आपापासतील मतभेदामुळे वेगळे होणार आहेत असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. 

नांदेड इथं महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी शाह आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, ही निवडणूक नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याची आहे. तुमचं एक मत केवळ प्रतापराव चिखलीकरांना विजयी करणार नाही तर दिल्लीत मोदींना पंतप्रधान बनवणारे आहेत. आज आपली अर्थव्यवस्था जगात पाचव्या नंबरवर आहेत. पुन्हा एकदा सरकार आल्यास ही अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबरवर जाणार आहे. ७० वर्ष काँग्रेसनं काश्मीरात कलम ३७० कायम ठेवले. काँग्रेस शासन काळात पाकिस्तानातून दहशतवादी यायचे, बॉम्बस्फोट घडवून जायचे. २०१४ मध्ये मोदींना पंतप्रधान बनवलं. पुलवामा घडलं, त्यानंतर १० दिवसांत एअर स्ट्राईक करून पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना संपवलं. आमच्या देशाचं सैन्य आणि देशाच्या सीमेला कुणी वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला सोडणार नाही असा संदेश भारताने जगाला दिला असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या सर्व राज्यात असलेल्या नक्षलवादाला मूळापासून उखडून टाकण्याचं काम भाजपानं केले. ७० वर्ष राम मंदिर प्रकरण थंडावले होते. २०१४ नंतर निकालही लागला, भूमिपूजन झालं आणि राम मंदिरही उभं राहिले. ५०० वर्षांनी रामनवमीला पहिल्यांदाच प्रभू राम टेंटमध्ये नव्हे तर भव्य मंदिरात असतील. काँग्रेस पक्षाने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण दिले परंतु त्यालाही ते आले नाही. ही निवडणूक २०४७ मध्ये देशाला पूर्ण विकसित देश बनवण्याचा संकल्प आहे. मजबूत भारताचा पाया रचण्याचा हा काळ आहे. एक असा भारत ज्याच्यासमोर कुणीही उभं राहून आव्हान देऊ शकत नाही असं अमित शाहांनी म्हटलं. 

शरद पवारांनी हिशोब द्यावा

शरद पवारांनी एक सांगावे, १० वर्ष तुम्ही काँग्रेस शासन काळात मंत्री होता, तुम्ही महाराष्ट्राला काय दिले? त्याचा हिशोब द्यावा. १० वर्षात पवारांनी १ लाख ९१ हजार कोटी दिले होते. पण मोदींच्या १० वर्षात ७ लाख १५ हजार कोटी महाराष्ट्राला देण्याचं काम झाले. त्याशिवाय ३ लाख ९० हजार कोटी विकासासाठी दिले, ५ लाख ७५ हजार कोटी राष्ट्रीय महामार्गासाठी दिले. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही. महाराष्ट्राचा विकास नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सरकारही करू शकते. १ कोटी २० लाख घरांमध्ये पाणी पोहचवलं, आयुष्यमान भारत योजनेतून अनेकांना लाभ होतोय. ७ कोटी जनतेला कोरोना आल्यापासून ५ किलो धान्य देण्याचं काम केले. शरद पवार इतके वर्ष राजकारणात होते पण महाराष्ट्राचा विकास करू शकले नाहीत अशी टीका अमित शाह यांनी शरद पवारांवर केली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाnanded-pcनांदेडSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे