शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
4
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
5
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
6
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
7
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
8
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
9
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
10
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
11
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
12
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
13
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
14
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
15
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
16
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
17
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
18
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
19
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
20
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

"नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 19:27 IST

Nanded Loksabha Election: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह हे नांदेडला आले होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसवर जोरदार टीका केली. 

नांदेड - Amit Shah on Mahavikas Aghadi ( Marathi News ) राहुल गांधींच्या नेतृत्वात ३ पक्ष एकत्र झालेत. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि एक अर्धवट उरलेली काँग्रेस पक्ष, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी दोघांनी काँग्रेसला अर्धे केले. तीन तिघाडा, काम बिघाडा हे तिघे महाराष्ट्राचं भलं करू शकतात का? निवडणुकीनंतर हे तिन्ही पक्ष आपापासतील मतभेदामुळे वेगळे होणार आहेत असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. 

नांदेड इथं महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी शाह आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, ही निवडणूक नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याची आहे. तुमचं एक मत केवळ प्रतापराव चिखलीकरांना विजयी करणार नाही तर दिल्लीत मोदींना पंतप्रधान बनवणारे आहेत. आज आपली अर्थव्यवस्था जगात पाचव्या नंबरवर आहेत. पुन्हा एकदा सरकार आल्यास ही अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबरवर जाणार आहे. ७० वर्ष काँग्रेसनं काश्मीरात कलम ३७० कायम ठेवले. काँग्रेस शासन काळात पाकिस्तानातून दहशतवादी यायचे, बॉम्बस्फोट घडवून जायचे. २०१४ मध्ये मोदींना पंतप्रधान बनवलं. पुलवामा घडलं, त्यानंतर १० दिवसांत एअर स्ट्राईक करून पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना संपवलं. आमच्या देशाचं सैन्य आणि देशाच्या सीमेला कुणी वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला सोडणार नाही असा संदेश भारताने जगाला दिला असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या सर्व राज्यात असलेल्या नक्षलवादाला मूळापासून उखडून टाकण्याचं काम भाजपानं केले. ७० वर्ष राम मंदिर प्रकरण थंडावले होते. २०१४ नंतर निकालही लागला, भूमिपूजन झालं आणि राम मंदिरही उभं राहिले. ५०० वर्षांनी रामनवमीला पहिल्यांदाच प्रभू राम टेंटमध्ये नव्हे तर भव्य मंदिरात असतील. काँग्रेस पक्षाने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण दिले परंतु त्यालाही ते आले नाही. ही निवडणूक २०४७ मध्ये देशाला पूर्ण विकसित देश बनवण्याचा संकल्प आहे. मजबूत भारताचा पाया रचण्याचा हा काळ आहे. एक असा भारत ज्याच्यासमोर कुणीही उभं राहून आव्हान देऊ शकत नाही असं अमित शाहांनी म्हटलं. 

शरद पवारांनी हिशोब द्यावा

शरद पवारांनी एक सांगावे, १० वर्ष तुम्ही काँग्रेस शासन काळात मंत्री होता, तुम्ही महाराष्ट्राला काय दिले? त्याचा हिशोब द्यावा. १० वर्षात पवारांनी १ लाख ९१ हजार कोटी दिले होते. पण मोदींच्या १० वर्षात ७ लाख १५ हजार कोटी महाराष्ट्राला देण्याचं काम झाले. त्याशिवाय ३ लाख ९० हजार कोटी विकासासाठी दिले, ५ लाख ७५ हजार कोटी राष्ट्रीय महामार्गासाठी दिले. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही. महाराष्ट्राचा विकास नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सरकारही करू शकते. १ कोटी २० लाख घरांमध्ये पाणी पोहचवलं, आयुष्यमान भारत योजनेतून अनेकांना लाभ होतोय. ७ कोटी जनतेला कोरोना आल्यापासून ५ किलो धान्य देण्याचं काम केले. शरद पवार इतके वर्ष राजकारणात होते पण महाराष्ट्राचा विकास करू शकले नाहीत अशी टीका अमित शाह यांनी शरद पवारांवर केली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाnanded-pcनांदेडSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे