शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

नाणारसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 5:44 AM

मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर या रिफायनरीच्या उपयुक्ततेबाबतचे सादरीकरण करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

विशेष प्रतिनिधीनागपूर - रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरीसाठी कलम ३२/१ नुसार भूसंपादन करण्यासंदर्भातील नोटीस ही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करूनच काढली होती. त्यांनी सादरीकरणही पाहिले. आता त्यांच्याशी बोललो म्हणजे भागेल असे वाटले होते पण आता मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर या रिफायनरीच्या उपयुक्ततेबाबतचे सादरीकरण करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. तथापि, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी एकवटत प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी करीत गदारोळ केला. या गदारोळात कामकाज तीनवेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाणारविषयी निवेदनाद्वारे सरकारची बाजू मांडली. मुख्यमंत्री म्हणाले की प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोरही प्रकल्पाबाबत सादरीकरण केले जाईल. स्थानिक नागरिक, संस्था, संघटनांना विश्वासात घेऊनच नाणार निर्णय घेऊ. प्रकल्प लादणार नाही. प्रकल्पासाठी सुरुवातीला स्थानिकांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. सहमतीदेखील झालेली होती. विरोध केवळ भूसंपादन दराबाबत होता. नंतर एनजीओ सक्रिय झाल्या. पर्यावरणाच्या मुद्यावरून विरोध सुरू झाला. त्यानंतर शिवसेनेकडून विरोध सुरू झाला.या प्रकल्पामुळे पर्यावरणावर कुठलाही दुष्परिणाम होणार नाही. आंबा वा इतर फळबागा उद्ध्वस्त होणार नाहीत. तीन लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पाने राज्याची अर्थव्यवस्थाच बदलेल. प्रकल्पाच्या एक-तृतियांश जमिनीवर फक्त हिरवळच असेल. या प्रकल्पासाठी गुजरात, आंध्र प्रदेशही उत्सुक होते. मात्र, केंद्राने महाराष्ट्राला पसंती दिली.समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा आधी विरोध होता पण आम्ही त्यांना प्रकल्पाचे महत्त्व समजून सांगितले. त्यांनी पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे नाणारबाबतही त्यांच्याशी चर्चा करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.अभूतपूर्व गोंधळ, कामकाज ठप्पमुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर समाधान न झालेल्या शिवसेना व विरोधी पक्ष सदस्यांनी नाणारविरुद्ध घोषणाबाजी सुरु केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाणारवरून सरकार अल्पमतात आले आहे. भाजपाचे १२३ सदस्य वगळता कुणाचाही प्रकल्पाला पाठिंबा नाही, असा हल्लाबोल केला. नाणार राहणार की जाणार एवढेच सांगा, असे राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले. शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी कोकण उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प शिवसेना कदापि होऊ देणार नाही, असे ठणकावले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाने प्रश्न प्रतिष्ठेचा न करता प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली. गोंधळामुळे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले आणि नंतर गोंधळातच आटोपण्यात आले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnanar refinery projectनाणार प्रकल्पUddhav Thackerayउद्धव ठाकरे