शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

Nagar Panchayat Election Result: “शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी निकालात भाजपाच नंबर १”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 4:08 PM

भाजपाला २०१७ मध्ये ३४४ जागा मिळाल्या होत्या तर यंदाच्या निकालात ४१७ जागा पटकावल्या आहेत

मुंबई – राज्यातील नगर पंचायतीच्या निकालाचे चित्र आता बहुतांश स्पष्ट झाले आहे. राज्यात महाविकास आघाडीने भाजपाचा धुव्वा उडवला आहे. परंतु महाविकास आघाडी आणि भाजपा या चारही पक्षांची कामगिरी पाहिली तर राज्यात भाजपा नंबर एक पक्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. २०१७ च्या निवडणुकीपेक्षा २०२२ मध्ये भाजपाने जास्त जागा जिंकल्याची आकडेवारी समोर आली आहे.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटलंय की, २०१७ चा निवडणूक निकाल व आताचा निवडणूक निकाल पाहता राज्यात भाजपा क्रमांक १ चा पक्ष आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढले तरी महाराष्ट्रातील जनता भाजपासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. उपाध्ये यांनी २०१७ आणि २०२२ च्या निवडणूक निकालाचे आकडे पोस्ट केले आहेत.

त्यात भाजपाला २०१७ मध्ये ३४४ जागा मिळाल्या होत्या तर यंदाच्या निकालात ४१७ जागा पटकावल्या आहेत. शिवसेनेने २०१७ मध्ये २०१ जागा जिंकल्या होत्या. त्यातही वाढ होऊन हा आकडा २९० इतका झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं २०१७ च्या निवडणुकीत ३३० जागा जिंकल्या होत्या त्यांना यंदाच्या निकालात ३६९ जागा मिळाल्या आहेत. यात मागील निवडणुकीच्या निकालाची तुलना केल्यास काँग्रेसला जबर फटका बसल्याचं दिसून येते. काँग्रेसला २०१७ च्या निकालात ४२६ जागा मिळाल्या होत्या तो आकडा २९९ पर्यंत खाली घसरला आहे.

राष्ट्रवादीचा देवेंद्र फडणवीसांना टोला

राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागले असून हे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे त्यामुळे हा पक्ष दोन-तीन जिल्ह्यापुरता मर्यादित आहे असं बोलणाऱ्यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी चपराक लगावली आहे अशा शब्दात NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(NCP Jayant Patil) यांनी देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) निशाणा साधला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा करुन तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रमे, आंदोलने, कार्यक्रमे हाती घेतली होती. जनता दरबार उपक्रमातून जनतेची कामेही तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न केला होता त्याचाही फायदा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला आहे. या निकालांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलणाऱ्यांना चांगलीच चपराक लागली आहे असं त्यांनी म्हटलं.

 

टॅग्स :Nagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस