शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
7
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
8
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
9
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
10
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
11
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
12
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
13
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
14
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
15
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
16
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
18
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
19
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
20
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे

एन. डी. पाटील यांना ‘सांगली भूषण’

By admin | Updated: January 9, 2017 20:25 IST

यंदाचा ‘सांगली भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत, रयत शिक्षण संस्थेचे कार्यवाह, माजी मंत्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना दिला जाणार असल्याची माहिती येथील विश्वजागृती

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 09 -  यंदाचा ‘सांगली भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत, रयत शिक्षण संस्थेचे कार्यवाह, माजी मंत्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना दिला जाणार असल्याची माहिती येथील विश्वजागृती मंडळाचे अध्यक्ष अरुण दांडेकर यांनी सोमवारी दिली. पंचवीस हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.विश्वजागृती मंडळातर्फे गेल्या १९ वर्षांपासून सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाºया व्यक्तीस ‘सांगली भूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना दिला जाणार आहे. पुरस्कार प्रदान समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.प्रा. डॉ. पाटील यांचा जन्म ५ जुलै १९२९ रोजी ढवळी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी एम.ए. (अर्थशास्त्र) आणि एल.एल.बी (पुणे विद्यापीठ) असे शिक्षण पूर्ण केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचे त्यांच्यावर संस्कार झाले. या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन प्रा. डॉ. पाटील यांनी १९५४ ते १९५७ या काळात सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात अध्यापन केले. १९६० मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या एकतिसाव्यावर्षी इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य, सिनेट सदस्य, कार्यकारिणी सदस्य, सामाजिकशास्त्र विभागाचे अधिष्ठाता, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, नंतर कार्यवाह, राज्य प्राथमिक शिक्षण आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.दरम्यान, १९४८ मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले. १९८५ ते १९९० ते विधानसभेचे सदस्य, तर अठरा वर्षे ते विधानपरिषदेचे सदस्य होते. १९७८-८० या काळात राज्याचे सहकारमंत्री म्हणून त्यांनी कामाचा स्वतंत्र ठसा उमटवला. एकाधिकार कापूस खरेदी योजना सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनीच घेतला. स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ (नांदेड), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ यांनी सन्माननीय डी.लिट्. पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे. प्रख्यात आणि प्रभावी वक्ते म्हणून प्रा. डॉ. पाटील यांची ओळख आहे. शेतकरी, कामगार, शोषित यांच्या अनेक लढ्यांचे नेतृत्व त्यांनी केले. आज वयाच्या ८८ व्या वर्षीही ते शेतकरी आणि सामान्यांच्या आंदोलनात अग्रभागी असतात.