शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

एन. डी. पाटील यांना ‘सांगली भूषण’

By admin | Updated: January 9, 2017 20:25 IST

यंदाचा ‘सांगली भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत, रयत शिक्षण संस्थेचे कार्यवाह, माजी मंत्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना दिला जाणार असल्याची माहिती येथील विश्वजागृती

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 09 -  यंदाचा ‘सांगली भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत, रयत शिक्षण संस्थेचे कार्यवाह, माजी मंत्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना दिला जाणार असल्याची माहिती येथील विश्वजागृती मंडळाचे अध्यक्ष अरुण दांडेकर यांनी सोमवारी दिली. पंचवीस हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.विश्वजागृती मंडळातर्फे गेल्या १९ वर्षांपासून सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाºया व्यक्तीस ‘सांगली भूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना दिला जाणार आहे. पुरस्कार प्रदान समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.प्रा. डॉ. पाटील यांचा जन्म ५ जुलै १९२९ रोजी ढवळी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी एम.ए. (अर्थशास्त्र) आणि एल.एल.बी (पुणे विद्यापीठ) असे शिक्षण पूर्ण केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचे त्यांच्यावर संस्कार झाले. या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन प्रा. डॉ. पाटील यांनी १९५४ ते १९५७ या काळात सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात अध्यापन केले. १९६० मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या एकतिसाव्यावर्षी इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य, सिनेट सदस्य, कार्यकारिणी सदस्य, सामाजिकशास्त्र विभागाचे अधिष्ठाता, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, नंतर कार्यवाह, राज्य प्राथमिक शिक्षण आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.दरम्यान, १९४८ मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले. १९८५ ते १९९० ते विधानसभेचे सदस्य, तर अठरा वर्षे ते विधानपरिषदेचे सदस्य होते. १९७८-८० या काळात राज्याचे सहकारमंत्री म्हणून त्यांनी कामाचा स्वतंत्र ठसा उमटवला. एकाधिकार कापूस खरेदी योजना सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनीच घेतला. स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ (नांदेड), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ यांनी सन्माननीय डी.लिट्. पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे. प्रख्यात आणि प्रभावी वक्ते म्हणून प्रा. डॉ. पाटील यांची ओळख आहे. शेतकरी, कामगार, शोषित यांच्या अनेक लढ्यांचे नेतृत्व त्यांनी केले. आज वयाच्या ८८ व्या वर्षीही ते शेतकरी आणि सामान्यांच्या आंदोलनात अग्रभागी असतात.