शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

"माझ्या मताधिक्याची टिंगल उडवली जातेय"; नाना पटोले विधानसभेत का संतापले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 13:52 IST

Nana Patole Maharashtra News: विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांचा २०८ मताधिक्याने विजय झाला. त्यावरून विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टिंगल उडवली. 

Nana Patole: "मी जे निवडून आलोय, त्याबद्दल टिंगल... तुम्हाला आता नंबर द्यावे लागतील उपमुख्यमंत्र्यांना भविष्यात. एक नंबरचा उपमुख्यमंत्री आणि दोन नंबरचा उपमुख्यमंत्री. मला मिळालेल्या २०८ मताधिक्याबद्दलची टिंगल याठिकाणी उडवली जातेय", असे म्हणत नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर झालेल्या भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पटोलेंच्या मताधिक्याचा उल्लेख करत टोला लगावला. 

मी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलोय -पटोले

विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले,  "खरंतर इथे निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो. किती मतांनी आला त्याची गिनती नाही. सुरूवातीलाच त्याची आकडेवारी असते. मी आणि देवेंद्रजी, पहिल्यांदा जेव्हा इथे आलो २००४ मध्ये सर्वाधिक मताधिक्याने आलो होतो. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मी सर्वाधिक मताधिक्य घेऊन आलो होतो. त्यामुळे इथे काही बक्षीस मिळतं असा चर्चेचा विषय होऊ शकत नाही." 

"लोकांनी मतदान केलं आहे. त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आहे. त्याबद्दलची टिंगल याठिकाणी केली जातेय. जनतेच्या मतांवरच हास्यकल्लोळ करायचा असेल, तर हे काही बरोबर नाही", अशा शब्दात नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली.   

एकनाथ शिंदे काय बोलले?

"गेल्यावेळी तुम्ही म्हणाला होतात की, डाव्या बाजूची जास्त काळजी घ्या. जनतेनेच डाव्या बाजूची जास्त काळजी घेतलेली आहे. खरं म्हणजे जयंतराव आहेत, तर आता मज्जा आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा सभागृहाच्या बाहेर गेले. नाना वाचले २०८. ईव्हीएममध्ये घोटाळा असता तर तुम्ही वाचले नसते", असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.  

अजित पवारांनीही पटोलेंना लगावला टोला

अजित पवार विधानसभेत बोलत असताना नाना पटोलेंनी गुलाबी जॅकेटबद्दल विचारलं. त्यावर अजित पवार म्हणाले, "गुलाबी जॅकेट आज मुख्यमंत्र्यांना दिले आहे. २०८ वाले आता रंगही विसरायला लागले आहेत. मला शिंदेंनी सांगितलं २०८", असे म्हणत अजित पवारांनी पटोलेंना डिवचलं.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nana Patoleनाना पटोलेEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार