मुंबई : माझे भांडण तुमच्या वडिलांशी आहे, ते सुरूच राहील पण माझा मुलगा तुमच्या वडिलांविरोधात काही बोलतोय असे घडणे नाही, असे विधान करत उद्धवसेनेचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांनी माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे पुत्र राज्यमंत्री योगेश कदम यांच्याविषयी बुधवारी विधानसभेत सकारत्मक टिप्पणी करत कटुता कमी झाल्याचे संकेत दिले. रामदास कदम आणि भास्कर जाधव यांच्यातील राजकीय वैर प्रसिद्ध असून त्याचा प्रत्यय वेळोवेळी येत राहिला आहे. मात्र कटुतेची रेषा पुसट करण्याचे काम जाधव यांनी सभागृहात बोलताना केले. ते म्हणाले, योगेश काल मला भेटला, हो सभागृहाबाहेर मी त्याला अरे कारेच म्हणणार. आज सभागृहात ते आहेत तेव्हा ‘अरे कारे’ म्हणणार नाही. तुमचे वडील आणि माझे भांडण राहील, ते राजकारण आहे, ते आम्ही करत राहू. ते आमच्या पाचवीलाच पूजलेले आहे, पण तुमच्या विषयी अशी भावना माझ्या मनात नाही, असे म्हणत जाधव यांनी कदम कुटुंबाशी असलेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मुंबईसह कोकणचे ७५ आमदार, मंत्री आहेत, त्यांनी कोकणच्या प्रश्नांवर सातत्याने एकत्र आले पाहिजे असे आवाहन जाधव यांनी केले.
दरम्यान, कोकणला २० हजार कोटी रुपयांची मदत राज्य सरकारने द्यावी आणि त्यातून स्थानिक समस्या सोडवाव्यात अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी चर्चेत केली त्यात संजय केळकर मनीषा चौधरी बाळा नर, सुनील प्रभू यांनी कोकणातील विविध प्रश्न मांडत सभागृहाचे लक्ष वेधले.
सचिवालयावर रोखविधिमंडळ सचिवालय राजकीय भेदभाव कधीपासून करायला लागले, असा सवाल करत भास्कर जाधव म्हणाले की, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मी मागणी केली होती की विधानसभेत कोकणासंदर्भात चर्चा होण्यासाठी प्रस्ताव आला पाहिजे.
ती मान्य करण्यात आली व तसे मला कळविले गेले पण नंतर मला असे कळाले की विधानमंडळ सचिवांनी असा सल्ला दिला की, विरोधकांचा प्रस्ताव आला तर ते सरकारवर टीका करतील.
त्यामुळे सत्ताधाऱ्यांचाही प्रस्ताव घेण्यात आला जेणेकरून त्यामध्ये सदस्य सरकारच्या बाजूने बोलू शकतील.
Web Summary : Bhaskar Jadhav softened stance towards Ramdas Kadam's family in assembly. Despite political rivalry with the father, he assured no animosity towards the son, Yogesh, advocating for united efforts on Konkan issues. He criticized secretariat bias, urging Konkan development with ₹20,000 crore aid.
Web Summary : भास्कर जाधव ने विधानसभा में रामदास कदम के परिवार के प्रति नरम रुख दिखाया। पिता से राजनीतिक दुश्मनी के बावजूद, उन्होंने बेटे योगेश के प्रति कोई दुर्भावना न होने का आश्वासन दिया, और कोंकण के मुद्दों पर एकजुट प्रयासों की वकालत की। उन्होंने सचिवालय के पूर्वाग्रह की आलोचना की, और ₹20,000 करोड़ की सहायता से कोंकण के विकास का आग्रह किया।