शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

माझा प्राण वर्षामध्ये नाही..., मला वर्षा सोडताना यातना झाल्या नाही, पण...; उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं मनातलं दुःख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 21:52 IST

Uddhav Thackeray : "मला नेमकं ते कळत नाहीये, अरे तुम्हाला कळतय का की, तुम्ही कोणाची हुजरेगिरी करताय, कोणाच्या पालख्या वाहताय?"

माझं काही तरी मुख्यमंत्री पद गेलं, अरे मी सोडून दिलं ते. कुठेही माझा जीव जळला नाही, कारण माझा प्राण वर्षामध्ये नाही, माझा प्राण तुमच्यामध्ये आहे. मला वर्षा सोडताना यातना नाही झाल्या, पण जेव्हा माझा कट्टर शिवसैनिक दुर्दैवाने आपल्यापासून जातो आणि काही वेळेला गैरसमजातून जातो, तेव्हा ज्या यातना होतात, इंगळ डसतात ना, हे दुःख मी केवळ दाखवू शकत नाही, म्हणून मला काय आनंद होतो, अशातला भाग नाहीये, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, मला नेमकं ते कळत नाहीये, अरे तुम्हाला कळतय का की, तुम्ही कोणाची हुजरेगिरी करताय, कोणाच्या पालख्या वाहताय? असा प्रश्नही यावेळी त्यांनी केला. ते ईशान्य मुंबईच्या वतीने आयोजित शिवसेनेच्या निर्धार शिबिरात बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, "इतकी वर्षे आपण ज्यांना डोक्यावर घेऊन दिल्ली दाखवली, दिल्लीत बसल्यानंतर ताबडतोब त्याच वर्षी २०१४ ला लोकसभा जिंकली त्यांनी (भाजपने) आणि विधानसभेमध्ये युती तोडली, तेव्हा आपण हिंदू होतो की नव्हतो? मग काय केलं होतं आपण असं पाप? एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे की, तेव्हा त्यांच्यावर जबाबदारी दिली होती की, आता ही युती तोडा. म्हणजे "गरज सरो वैद्य मरो". त्याच्यानंतर पुन्हा आपण त्यांच्याबरोबर गेलो. का? कारण हिंदुत्व? मग १९ साली पुन्हा ते अमित शहा वगैरे घरी आले, त्याच्यानंतर पुन्हा धोकाधडी झाली, त्याच्यानंतर अडीच वर्षांनी पुन्हा गद्दारी करून आपलं सरकार पाडलं. पण आज सुद्धा तुमच्यासारखे अनेक कट्टर कडवट शिवसैनिक माझ्यासोबत आहेत."

मी कोण आहे? मी कोणीच नाहीये... -ठाकरे म्हणाले, "मी काय दिले तुम्हाला? काही देऊ शकत नाही. आज माझ्याकडे काय आहे? हे तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे की, मी काही देऊ शकत नाही. उद्या, उद्याचं उद्या. पण आता तरी हातात काय आहे? काहीच नाही माझ्या हातामध्ये. तरीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत राहिलात, तरीसुद्धा सोबत राहिलात. आणि केवळ हे माझं काही कौतुक नाहीये, हे हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुखांनी जे काही त्यांची पुण्याई उभी केलेली आहे त्याचे हे सर्व चित्र आहे. मी कोण आहे? मी कोणीच नाहीये आणि म्हणून मी अभिमानाने पुढे चाललेलो आहे."

तरीसुद्धा मी ठाम उभा आहे, हातामध्ये मशाल घेऊन -"निवडणूक आयोगाने आपल्यावर अन्याय केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून लागत नाहीये. एक एक न्यायमूर्ती येत आहेत आणि जात आहेत, येत आहेत आणि जात आहेत. पुढच्या वर्षी लवकर, तसे पुन्हा जात आहेत. ५० वर्षे..., ७० वर्षे... आमच्या केसला, आता ७५ वर्षे झाली, त्याचा आम्ही आता अमृत महोत्सव करतोय, रौप्य महोत्सव करतोय, सुवर्ण महोत्सव, का? अहो केस केलीय, माहित नाही तुम्हाला? शंभर वर्ष झाली आमच्या केसला, निकालच लागत नाही अजून! ही असली लोकशाही घेऊन आपण पुढे जातो आहोत आणि तरीसुद्धा मी ठाम उभा आहे, हातामध्ये मशाल घेऊन," असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा