शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

संगीतात साधनेशिवाय पर्याय नाही - आनंद भाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 2:28 AM

‘दिवाळी पहाट’सारख्या सांगीतिक कार्यक्रमांमुळे रसिकांमध्ये संगीविषयीची रुची निर्माण होण्यास मदत झाली आहे. कोणते कार्यक्रम सादर होणार आहेत, कलाकार कोण आहेत. याकडे रसिकांचे लक्ष लागलेले असते. यातच अनेक मैफली सायंकालीन असल्याने सकाळच्या प्रहरातील रागांचा आस्वाद रसिकांना घेता येत नाही. ते राग ऐकण्याची संधी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांमधून रसिकांना मिळते, असे सांगून प्रसिद्ध ...

‘दिवाळी पहाट’सारख्या सांगीतिक कार्यक्रमांमुळे रसिकांमध्ये संगीविषयीची रुची निर्माण होण्यास मदत झाली आहे. कोणते कार्यक्रम सादर होणार आहेत, कलाकार कोण आहेत. याकडे रसिकांचे लक्ष लागलेले असते. यातच अनेक मैफली सायंकालीन असल्याने सकाळच्या प्रहरातील रागांचा आस्वाद रसिकांना घेता येत नाही. ते राग ऐकण्याची संधी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांमधून रसिकांना मिळते, असे सांगून प्रसिद्ध युवागायक आनंद भाटे यांनी दिवाळी पहाटमध्ये एखाद्या संगीत नाटकाचा प्रयोग होण्यासही हरकत नाही, अशी अपेक्षा ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.दिवाळी म्हणजे दिवाळी पहाट हे समीकरण आज सर्वमान्य झाले आहे. पहाटेच्या मैफली तशा विशेष होत नसल्यामुळे पहाटेच्या मैफली हेच दिवाळीचे वैशिष्ट्य आहे. बºयाच ठिकाणी एकाच वेळेला कार्यक्रम सुरू असतात. तरी सगळ्याच कार्यक्रमांना रसिकांची गर्दी असते. गेल्या चार वर्षांपासून ‘लोकमत’देखील ‘दिवाळी पहाट’करीत आहे ही कौतुकाची बाब आहे.‘कट्यार काळजात घुसली’ आणि ‘बालगंधर्व’च्याद्वारे संगीत वेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले. खूप जण येऊन सांगतात, की बालगंधर्वमुळे आपल्याला संगीताची इतकी मोठी परंपरा आहे हे कळले. यामुळे नाट्यसंगीतच नाही तर शास्त्रीय संगीतही ऐकायला लागलो. ‘बालगंधर्व’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ हे संगीतातील दोन माईलस्टोन ठरले आहेत.दिवाळी पहाटमध्ये संगीत नाटके फारशी होत नाहीत. कारण नाटके ही रात्रीच होण्याची परंपरा आहे. परंतु नाट्य आणि शास्त्रीय संगीताचेकार्यक्रम मोठ्या संख्येने होतात. दिवाळी पहाटला संगीत नाटकाचा एखादा प्रयोग व्हायला हरकत नाही. इतर ठिकाणी असे प्रयोग झालेले आहेत. पूर्वीपासून संगीताच्या प्रवाहात अनेक बदल झाले आहेत. पंडित भीमसेन जोशी यांनीदेखील संगीतात सूक्ष्म बदल केले. मात्र संगीताच्या गाभ्याला धक्का लावला नाही. नवीन काहीतरी करायचे, म्हणून परंपरा सोडून दिली तर ते योग्य ठरणार नाही. परंपरा जपून नवीन पद्धतीने सादरीकरण करण्यास कोणतीच हरकत नाही.रागाचा गाभा तोच ठेवून नवीन वाद्यांमधून जर त्याचे सादरीकरण होत असेल तर नव आविष्काराचा अनुभव मिळतो. त्यामुळे फ्यूजन हा प्रकार चांगला की वाईट यापेक्षा तो सादर कसा केला जातो, याला जास्त महत्त्व असल्याचे ते सांगतात. हल्लीची जीवनशैली ही जलद बनली आहे. गायक आणि रसिकांच्या ऐकण्याची सहनशीलता कमी होत चालली आहे. एखादा राग पूर्वी दीड दीड तास गायला जायचा. तो आज सर्वसामान्य मैफलीमध्ये दिसत नाही.यापुढील काळात शास्त्रीय मैफलीमध्ये हे राग सादर होत राहतील. पण छोट्या मैफलींमध्ये हे प्रमाण खूप कमी राहील. राग तीस मिनिटांमध्येसुद्धा अशा पद्धतीने सादर केला जाऊ शकतो. त्यातून मैफलीचा पूर्ण आनंद मिळू शकेल.पंडित भीमसेन जोशींनी हे प्रयोग केले होते. त्यांनी मैफलीत दीड दीड तास राग गायले आणि त्याबरोबरीने रेकॉर्डिंगदेखील वीस ते तीस मिनिटांचे केले. कलाकारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, की तीस मिनिटांमध्ये राग सादर करताना पूर्ण गाभा त्यात आला पाहिजे. त्यामुळे ही कलाकारांची मोठी जबाबदारी आहे. रिअ‍ॅलिटी शोकडे आपण कसे पाहतो हे महत्त्वाचे आहे. याचे फायदा आणि तोटा दोन्ही आहेत. अशा शोमुळे व्यासपीठ मिळते. कलाकार, मुले आणि पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे, हे आपले अंतिम ध्येय आहे. संगीतक्षेत्रात करिअरकरायचे असेल तर साधनेशिवाय पर्याय नाही.

टॅग्स :musicसंगीतPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र