शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
4
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
5
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
6
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
7
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
8
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
9
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
10
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
11
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
12
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
13
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
14
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
15
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
16
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
17
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
18
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
19
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
20
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
Daily Top 2Weekly Top 5

“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 05:35 IST

अगोदर ईव्हीएमचे नॅरेटीव्ह पसरवले; आता त्यांचा बिनविरोधला विरोध

लाेकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्याच टप्प्यात महायुतीचे २१ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने काहींना पोटदुखी झाली. पण माझे त्यांना सांगणे आहे की, ‘तुमको मिरची लगी तो मैं क्या करू’, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना बुधवारी टोला लगावला. 

यापूर्वी संसदेत ३५ खासदार बिनविरोध निवडून आले होते. त्यापैकी ३३ खासदार हे काँग्रेसचे होते. त्यावेळी लोकशाही जिवंत होती आणि आता महायुतीचे उमेदवार निवडून आले तर लोकशाहीची हत्या झाली का, असा सवाल त्यांनी केला. महापालिका निवडणुकीसाठी कल्याण पूर्वेत आयोजित प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. फडणवीस यांच्या उल्हासनगर व भिवंडी येथेही बुधवारी सभा झाल्या. फडणवीस म्हणाले की, विरोधकांना निवडणुकीसाठी उमेदवार मिळत नव्हते. 

‘उल्हासनगरातील गुंडाराज संपवणार’

उल्हासनगर : महापालिका स्थापनेनंतर गेल्या ३० वर्षांपासून सत्तेत असलेल्यांनी उल्हासनगरला काय दिले? उल्हासनगरची अवस्था गावापेक्षाही वाईट आहे. पण, आता हे चित्र बदलायचे आहे. शहरातील गुंडगिरी मोडीत काढून कायद्याचे राज्य प्रस्थापित करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी चार हजार कोटी रुपये देण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. याचं तुम्हाला दु:ख का होते? महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्याविषयी विरोधकांकडून नवे नॅरेटिव्ह पसरवले जात आहे. महायुतीचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत जिंकून आले तेव्हा ईव्हीएमचे नॅरेटिव्ह पसरवले. आता बिनविरोधला विरोध करण्यास विरोधकांनी सुरुवात केली.

भिवंडीला लॉजिस्टिक हब बनवणार

भिवंडी : ऐतिहासिक परंपरा असलेल्या भिवंडी शहरात ११ तलाव होते. त्यापैकी फक्त पाच शिल्लक राहिले आहेत. या शहराच्या विकासाची मानसिकता येथील महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची नाही, ती फक्त भाजपमध्ये आहे. भिवंडी हे व्यापार दृष्टीने महत्त्वाचे शहर बनणार असून, येथील लॉजिस्टिक हबला सर्व सुविधा व रस्त्यांची कनेक्टिव्हिटी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. मनपा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीस यांची छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विजय संकल्प सभा संपन्न झाली.

विलासरावांबद्दल आदर; मुख्यमंत्र्यांचे डॅमेज कंट्रोल

लातूर : काँग्रेसच्या ७० वर्षांच्या दुर्लक्षामुळे शहरांचे बकालीकरण झाले. परंतु भाजपचे सरकार आल्यानंतर शहरांचा विकास साधल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे स्पष्ट केले. रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भाने डॅमेज कंट्रोल करीत मुख्यमंत्र्यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल नितांत आदर असल्याचा पुनरुच्चार केला.

English
हिंदी सारांश
Web Title : When Congress MPs won unopposed, was democracy not threatened?: Fadnavis

Web Summary : CM Fadnavis criticized the opposition for questioning unopposed MahaYuti wins. He highlighted past instances of Congress MPs winning unopposed, questioning their hypocrisy. He also promised development for Ulhasnagar and Bhiwandi.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक २०२६Bhiwandi Nizampur Municipal Corporation Electionभिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक २०२६Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस