मुंबईचा टक्का घसरला

By Admin | Updated: June 3, 2014 01:02 IST2014-06-03T01:02:50+5:302014-06-03T01:02:50+5:30

बारावी परीक्षेला मुंबई विभागातून 2 लाख 87 हजार 814 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 2 लाख 54 हजार 138 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विभागाचा एकूण निकाल 88.3क् टक्के लागला आहे.

Mumbai's slump fell | मुंबईचा टक्का घसरला

मुंबईचा टक्का घसरला

>बारावी निकाल : 28,781 जणांना 75}हून अधिक गुण
मुंबई : बारावी परीक्षेला मुंबई विभागातून 2 लाख 87 हजार 814 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 2 लाख 54 हजार 138 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विभागाचा एकूण निकाल 88.3क् टक्के लागला आहे. मुंबईत कॉपीची 52 आणि 1 पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आले. मंडळांमध्ये मुंबईत सर्वाधिक कमी क्.क्1 टक्के कॉपीचे प्रमाण नोंदविले आहे. राज्यात कोकण विभाग अव्वल असून, मुंबई विभाग शेवटच्या स्थानावर आहे. गतवर्षीपेक्षा 1क़्क्8 टक्क्यांनी निकालात वाढ झाली आह़े
परीक्षेत 28 हजार 781 विद्याथ्र्याना 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर 6क् टक्क्यांहून अधिक गुण 84 हजार 88 विद्याथ्र्याना, 45 टक्क्यांपेक्षा अधिक गुण 1 लाख 21 हजार 691 विद्याथ्र्याना आणि 35 टक्क्यांहून पुढे गुण 19 हजार 578 विद्याथ्र्याना मिळाले आहेत. कला शाखेतून 43 हजार 486 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 36 हजार 812 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  कला शाखेचा एकूण निकाल 84.65 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून 78 हजार 585 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 
त्यापैकी 71 हजार 281 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेचा निकाल 9क्.71 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून 1 लाख 6क् हजार 698 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1 लाख 41 हजार 276 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल 87.91 टक्के लागला आहे. तर एमसीव्हीसी शाखेचा निकाल 94.53 टक्के लागला आहे. (प्रतिनिधी)
 
खासगीरीत्या परीक्षेला बसणा:या विद्याथ्र्यामुळे निकाल घटला
मुंबई विभागीय मंडळातून खासगीरीत्या (17 नंबरचा अर्ज भरून) परीक्षेला बसणा:या विद्याथ्र्याची संख्या मोठी आहे. इतर मंडळांच्या कित्येक पट अधिक म्हणजे 2क्,734 विद्यार्थी खासगीरीत्या परीक्षेला बसले होते. यामधील किरकोळ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होतात. मात्र, अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्याने मंडळाचा निकाल घटला असल्याचे मत मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी व्यक्त केले.
 
मुंबई विभागातून परीक्षेला 1,52,847 मुले बसली होती, तर 1,34,967 मुली बसल्या होत्या. यामधील 1,29,51क् मुले उत्तीर्ण झालीआहेत, तर 1 लाख 24 हजार 628 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 84.73 टक्के मुले या परीक्षेत उत्तीर्ण झाली असून 92.34 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुंबईतही मुलींनीच बाजी मारली आहे.
 
अनुत्तीर्ण विद्याथ्र्याना नवीन 
अभ्यासक्रमानुसार द्यावी लागणार परीक्षा
बारावीचा अभ्यासक्रम गेल्या वर्षी बदलण्यात आला. तरीही फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेलाविद्यार्थी जुन्या अभ्यासक्रमानुसार  बसले होते. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्याना ऑक्टोबर 2क्14 व त्यापुढील परीक्षेला नवीन अभ्यासक्रमानुसार बसावे लागणार आहे.

Web Title: Mumbai's slump fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.