शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मालवणी भाषा टिकवण्यासाठी मुंबई विद्यापीठ प्रयत्नशील - सुहास पेडणेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 03:06 IST

मुंबई विद्यापीठाने मालवणी भाषेचा अभ्यासक्रमात समावेश केला. या भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मुंबई विद्यापीठ कायम प्रयत्नशील असेल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सहाव्या मालवणी बोली साहित्य संमेलनात रविवारी दिले.

मुंबई  - मुंबई विद्यापीठाने मालवणी भाषेचा अभ्यासक्रमात समावेश केला. या भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मुंबई विद्यापीठ कायम प्रयत्नशील असेल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सहाव्या मालवणी बोली साहित्य संमेलनात रविवारी दिले.रविवारी सकाळी दादर येथील नायर सभागृहात मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्राच्या सहाव्या मालवणी बोली साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डॉ. पेडणेकर यांनी सांगितले की, कुलगुरूपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदा सिंधुदुर्ग दौरा केला होता, त्यानंतर तेथे विद्यापीठाने महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला. येथील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस)चे विद्यार्थी आणि जलदूत राजेंद्र सिंह यांच्या संकल्पनेतून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा उपक्रम तेथे राबविण्यात येत आहे. या जिल्ह्यानंतर लवकरच हा प्रकल्प रायगड आणि पालघर येथे राबविण्यात येणार आहे. मालवणी तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता झाराप येथे २५ एकरांत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जेणेकरून, आपल्या मातीत राहून ही पिढी भूमीला अधिक वृद्धिंगत करेल. या वेळी कुलगुरूंनी अस्सल मालवणी भाषेत उपस्थितांशी संवाद साधला.

या वेळी उद्घाटन समारंभात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मालवणी भाषेत सांगितले की, मालवणी भाषा टिकायला हवी. त्यासाठी आपणास संवाद वाढवायला हवा. अजूनही घरात या भाषेतून संवाद होतो. त्यामुळे त्याचा न्यूनगंड न बाळगता ही भाषा टिकायला हवी़ त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अखेरीस मालवणी माणूस महापौर असल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी उपस्थितांना चहासाठी महापौर बंगल्यावर येण्याचे आवाहनही केले. या उद्घाटन सोहळ्याला संमेलनाचे मावळते अध्यक्ष ज्येष्ठ मालवणी नाटककार गंगाराम गवाणकर, संमेलाध्यक्ष प्रभाकर भोगले, मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्र सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत आणि कार्याध्यक्ष सतीश लळीत, अभिनेता अनिल गवस उपस्थित होते. याप्रसंगी अभिनेते अनिल गवस यांनी सांगितले की, मालवणी माणसांकडे प्रचंड गुणवत्ता आहे़ केवळ आपल्या माणसांशी न भांडता ती ऊर्जा कामाप्रति वापरली पाहिजे. मावळते संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी ‘वस्त्रहरण’ नाटकाच्या स्मृतींना उजाळा दिला़संमेलनाच्या माध्यमातून भाषा संवर्धनाला मिळेल गती

मालवणी भाषेची तशी काळजी करायची गरज नाही, कारण जोवर मालवणी बोलीभाषा घरोघरी नांदतेय तोवर तिला मरण नाही. तिचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे या प्रक्रियेकरिता अधिकाधिक माहितीची देवाण-घेवाण झाली पाहिजे. अशा संमेलनाच्या माध्यमातून या प्रक्रियेला अधिक गती मिळेल ही आशा आहे.- प्रभाकर भोगले, संमेलनाध्यक्ष

टॅग्स :marathiमराठीMumbaiमुंबईsindhudurgसिंधुदुर्ग