शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Coronavirus: धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 19:29 IST

Coronavirus: गुरुवारी दिवसभरात धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देधारावीमध्ये दिवसभरात केवळ एका रुग्णाची नोंदमुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी ४७७ दिवसांवर

मुंबई:मुंबईकरांसाठी विशेष दिलासादायक वृत्त आहे. मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून धारावी परिसर चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, आता धारावी परिसराची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे सांगितले जात असून, गुरुवारी दिवसभरात धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. (mumbai dharavi reports only one corona positive case on thursday) 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा मुंबई, महाराष्ट्रासह देशाला बसला होता. मात्र, मुंबई महानगर परिसरात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात ओसरताना दिसत आहे. धारावीमध्ये कोरोनाचा केवळ एक रुग्ण आढळणे ही खूपच सकारात्मक बाब असून, धारावी परिसरात आताच्या घडीला १९ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या धारावीत दाटीवाटीची वस्ती आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येणाऱ्या अडथळ्यांमुळे करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला होता. 

रुग्ण दुपटीचा कालावधी ४७७ दिवसांवर

बुधवार, २ जून रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल ४७७ दिवसांवर गेला आहे. याच कालावधीत मुंबईत ९२५ नव्या रुग्णांची नोंद झाली होती, तर ६३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. शहरातील बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६७४२९६ इतकी आहे. तसंच बऱ्या झालेल्या रुग्णांचा दर ९५ टक्के इतका आहे. शहरात करोनाचे एकूण सक्रिय रुग्ण १६५८० इतके आहेत.

कोव्हॅक्सिनच्या लसीची २ ते १८ वयोगटातील मुलांवर ट्रायल सुरू; ३ जणांना दिला पहिला डोस

अद्याप पूर्णपणे अनलॉक नाहीच!

राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाने मोठा निर्णय जाहीर केला होता. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. परंतु त्यानंतर राज्यातील निर्बंध उठवण्यात आले नाहीत आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडसची उपलब्धता यावरून  निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील असे अवघ्या काही मिनिटांतच शासनाद्वारे सांगण्यात  आले. 

“गोपीनाथ मुंडे असते तर सरकारची ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती”

दरम्यान, विजय वडेट्टीवारांनी परस्पर घोषणा करून टाकली का?, मुख्यमंत्र्यांना त्यांनी कल्पनाच दिली नव्हती का?, सरकारमध्येच 'अनलॉक'बाबत एकमत नाही का?, ही घोषणा नेमकी कधी आणि कुणी करणे योग्य आहे, की हा श्रेयवादाचा विषय आहे?, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबई