शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Coronavirus: धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 19:29 IST

Coronavirus: गुरुवारी दिवसभरात धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देधारावीमध्ये दिवसभरात केवळ एका रुग्णाची नोंदमुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी ४७७ दिवसांवर

मुंबई:मुंबईकरांसाठी विशेष दिलासादायक वृत्त आहे. मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून धारावी परिसर चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, आता धारावी परिसराची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे सांगितले जात असून, गुरुवारी दिवसभरात धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. (mumbai dharavi reports only one corona positive case on thursday) 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा मुंबई, महाराष्ट्रासह देशाला बसला होता. मात्र, मुंबई महानगर परिसरात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात ओसरताना दिसत आहे. धारावीमध्ये कोरोनाचा केवळ एक रुग्ण आढळणे ही खूपच सकारात्मक बाब असून, धारावी परिसरात आताच्या घडीला १९ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या धारावीत दाटीवाटीची वस्ती आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येणाऱ्या अडथळ्यांमुळे करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला होता. 

रुग्ण दुपटीचा कालावधी ४७७ दिवसांवर

बुधवार, २ जून रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल ४७७ दिवसांवर गेला आहे. याच कालावधीत मुंबईत ९२५ नव्या रुग्णांची नोंद झाली होती, तर ६३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. शहरातील बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६७४२९६ इतकी आहे. तसंच बऱ्या झालेल्या रुग्णांचा दर ९५ टक्के इतका आहे. शहरात करोनाचे एकूण सक्रिय रुग्ण १६५८० इतके आहेत.

कोव्हॅक्सिनच्या लसीची २ ते १८ वयोगटातील मुलांवर ट्रायल सुरू; ३ जणांना दिला पहिला डोस

अद्याप पूर्णपणे अनलॉक नाहीच!

राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाने मोठा निर्णय जाहीर केला होता. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. परंतु त्यानंतर राज्यातील निर्बंध उठवण्यात आले नाहीत आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडसची उपलब्धता यावरून  निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील असे अवघ्या काही मिनिटांतच शासनाद्वारे सांगण्यात  आले. 

“गोपीनाथ मुंडे असते तर सरकारची ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती”

दरम्यान, विजय वडेट्टीवारांनी परस्पर घोषणा करून टाकली का?, मुख्यमंत्र्यांना त्यांनी कल्पनाच दिली नव्हती का?, सरकारमध्येच 'अनलॉक'बाबत एकमत नाही का?, ही घोषणा नेमकी कधी आणि कुणी करणे योग्य आहे, की हा श्रेयवादाचा विषय आहे?, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबई