शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

मुंबईत ६५ वर्षांत ५१ वेळा २०० मिमी पाऊस, धुवांधार पावसानं संपूर्ण जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 2:32 AM

मुंबई तसेच कोकणात २९ आॅगस्ट आणि १९ सप्टेंबर या दोन दिवशी धुवाधार पाऊस होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते़ संपूर्ण मुंबईत पाणी साचल्याने मुंबईचे वर्णन तुंबई असे केले गेले़

विवेक भुसे पुणे / मुंबई : मुंबई तसेच कोकणात २९ आॅगस्ट आणि १९ सप्टेंबर या दोन दिवशी धुवाधार पाऊस होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते़ संपूर्ण मुंबईत पाणी साचल्याने मुंबईचे वर्णन तुंबई असे केले गेले़ असे असले तरी ही काही पहिलीच वेळ नाही़ मुंबईत एकाच दिवसात २०० मिमी पाऊस होणे हे सामान्य असल्याचे मागील ६५ वर्षांतील आकडेवारी पाहिली असता दिसून येते़ पुणे हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात १९५० ते २०१५ या ६५ वर्षांत मुंबईत तब्बल ५१ वेळा एका दिवसात २०० मिमी पाऊस झाल्याचे आढळून आले आहे़ त्यामुळे पाऊस हा नेहमीसारखाच असला तरी पावसाच्या पाण्याचे निचरा न होणे हे त्यामागील कारण असल्याचे स्पष्ट होते.पुणे हवामान विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ एक़े. श्रीवास्तव यांनी याबाबत केलेल्या अभ्यासात हे दिसून आले आहे़ मुंबई व कोकण विभागात पावसाळ्यामध्ये एका दिवसात २०० मिमी पाऊस होणे ही तशी सामान्य घटना आहे़ मागील ६५ वर्षांत अनेकदा असे आढळून आले की, एकाच वर्षात एकाच दिवसात २०० मिमी पाऊस दोनदा किंवा काही वेळा तीनदा पडला आहे़मुंबई व कोकणात पडणारा इतका पाऊस हा हवामानाच्या दृष्टीने पाहिले तर सर्वसाधारण आहे़ मागील पाच वर्षांचा विचार केला तर २०११ मध्ये २८ व २९ आॅगस्टला सांताक्रूझ येथे अनुक्रमे २२०़४ मिमी व २३२ मिमी पाऊस पडला होता़ त्यानंतर २०१२ मध्ये एका दिवसात इतका पाऊस झाला नाही़ २४ जुलै २०१३ रोजी २१५़६ मिमी, ३ जुलै २०१४ रोजी २०७ मिमी व १९ जुलै २०१५ रोजी २८३ मिमी पाऊस एकाच दिवशी पडला होता़ तसेच २००९ मध्ये ५ व १५ जुलै, २००७ मध्ये २४ जून आणि १ जुलै तसेच २००५ मध्ये तर ५ व २७ जुलै व १ आॅगस्ट अशा एका वर्षात दोन किंवा तीन वेळा एकाच दिवशी २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस मुंबईत पडला़ हे पाहता एका दिवशी २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस मुंबईमध्ये साधारणपणे नियमित होत असतो़१९५० ते २०१५ या ६५ वर्षांत ५१ वेळा एकाच दिवसात २०० मिमी पाऊस झाला होता़१० वर्षांमध्ये एकाच पावसाळ्यात २ वेळा २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस.२ वर्षे एकाच हंगामात तीन वेळा २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस (१९५८ आणि २००५ ).१९५२ मध्ये ४ वेळा एकाच दिवसात २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस़