शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मुंबई ३५ अंश; कमाल तापमानाचा वाढता पारा ठरणार ‘ताप’दायक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 5:54 AM

गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले.

मुंबई : मुंबईसह राज्यभरातून थंडीने ‘पॅक अप’ केल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने रविवारी केली असतानाच, मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान थेट ३५ अंश नोंदविण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास काही काळ ऊन, दुपारी बाराच्या सुमारास काही काळ ढगाळ वातावरण, अडीचच्या सुमारास पुन्हा रखरखीत ऊन आणि काही काळ वातावरणात उठलेली धूळ, अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव मंगळवारी मुंबईकरांनी घेतला. हवेतला किंचितसा गारवाही हळूहळू कमी होत असल्याने, कमाल तापमानाचा वाढता पारा मुंबईकरांना ‘ताप’दायक ठरणार आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मुंबईचा विचार करता, मुंबईकरांची मंगळवारची दुपार ‘ताप’दायक ठरली. कमाल तापमान ३५ अंश आणि वातावरणात उठलेल्या धुळीने येथील वातावरण काहीसे धूळसदृश्य झाले होते.

दरम्यान, दुसरीकडे मुंबईचे किमान तापमान २२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. दिवसाच्या वातावरणातील गारवा कमी होत असला, तरी रात्रीच्या हवेतला गारवा किंचित का होईना, टिकून असल्याचे चित्र आहे.नागपूरमध्ये सर्वांत कमी किमान तापमानच्राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नागपूर येथे ११.८ अंशनोंदविण्यात आले.च्१२ ते १५ फेब्रुवारीपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते.च्१२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मुंबई आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २४ अंशाच्या आसपास राहील.राज्यातील शहरांचे मंगळवारचे कमाल तापमानमंगळवारी सकाळी ११च्या सुमारास काही काळ ऊन, दुपारी १२च्या सुमारास काही काळ ढगाळ वातावरण

टॅग्स :TemperatureतापमानHeat Strokeउष्माघात