शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

मुुस्लिम साहित्याने वेगळेपण जपत पुढे जावे

By admin | Updated: May 22, 2016 04:14 IST

मुस्लिम या मातीतला आहे, तरीही संशयाचं वातावरण निर्माण करून त्यावर बळजबरीने लादल्या गेलेल्या परकेपणामुळे त्याचं एकाच वेळेला आत आणि बाहेर असणं त्याला वेगळी दृष्टी देते

कोल्हापूर : मुस्लिम या मातीतला आहे, तरीही संशयाचं वातावरण निर्माण करून त्यावर बळजबरीने लादल्या गेलेल्या परकेपणामुळे त्याचं एकाच वेळेला आत आणि बाहेर असणं त्याला वेगळी दृष्टी देते. इतरांच्या नजरेतून निसटलेलं वास्तव तो पाहू शकतो. हेच वेगळेपण घेऊन मुस्लिम साहित्याने पुढे सरकायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांनी व्यक्त केले. मुस्लिम साहित्य चळवळीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुस्लिम बोर्डिंग हाऊसतर्फे शनिवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.संमेलनाध्यक्षपदावरुन बोलताना खान म्हणाले, की जगभर साहित्य, नाटक बदलत आहे. उसन्या अनुभवानंतर काल्पनिक साहित्य रचणारे मागे पडले आहेत. कारण आता प्रत्यक्ष दु:ख, वेदना भोगणारेच आपल्या भाषेत बोलू, लिहू लागले आहेत. त्यांनी लिहावं म्हणून जगभर प्रयत्न केले जात आहेत. ते स्वीकारलंही जात आहे. साहित्य चळवळीतील वेगळपण समजून घेऊन वाचकांना सांगणारे समीक्षकही आपल्याकडे तयार व्हायला हवेत, तरच हा साहित्यप्रवाह बळकट होईल. सध्याच्या सामाजिक परिस्थतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणल्या जात आहेत. परिघाबाहेरची माणसं कष्टानं बोलू पाहत होती. त्यांचे आवाज निर्दयीपणे दडपले जात आहेत. त्यामुळे समविचारी साहित्यिकांनी एकत्र येणं, निर्भय बोलणं, विचार ऐक णं, यासाठी अशी छोटी साहित्य संमेलने महत्त्वाची आहेत.स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, भाषेला कोणताही धर्म नसतो. भाषेच्या विकासात सर्वच धर्मातील संतांनी योगदान देऊन समृद्ध केले आहे. महाराष्ट्रातील मुस्लिमांचीही मातृभाषा मराठीच असल्याने त्यांचे योगदान भाषा विस्तारासाठी मोलाचे आहे. स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. ताज मुलानी यांनी सूत्रसंचालन, गणी आजरेकर यांनी स्वागत, तर डॉ. राजेखान शाणेदिवाण यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)