शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

पीकविमा कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे मोदींचे स्वप्न भंग: सुजय विखे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 12:05 PM

वेळप्रसंगी शेतकऱ्यांना सोबत घेऊन विमा कंपन्यांसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सुद्धा सुजय विखे यांनी दिला.

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असताना, पिक विमा भरूनही विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळत नसल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असताना आता भाजपचे खासदार सुजय विखे यांनी सुद्धा पीक विमा कंपन्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची विखे यांनी भाळवणी, वासुंदे, कर्जुलेहर्या येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तर याचवेळी त्यांनी पीक विमा कंपन्यांवर टीका सुद्धा केली. पीकविमा कंपन्या हा महाराष्ट्राला लागलेला सर्वात मोठा शाप आहे. या कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न भंग होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

मी कोणत्याही पक्षाचा असलो तरीही माझ्यासाठी आधी शेतकरी महत्वाचा आहे. त्यामुळे वेळप्रसंगी शेतकऱ्यांना सोबत घेऊन विमा कंपन्यांसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सुद्धा सुजय विखे यांनी दिला. पीक विमा कंपनीचा एकच प्रतिनिधी तालुकापातळीवर आहे. लोक ऑनलाइन अर्ज करतात. त्यानंतर त्यांनी भरपाई मागायची कोणाकडे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पीक विमा भरून सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने गेल्या काही महिन्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विमा कंपनीवर मोर्चा काढला होता. त्यांतर आता पुन्हा शिवसेना याच मुद्यावरून आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र आता भाजपचे खासदार सुजय विखे यांनी सुद्धा विमा कंपनीच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तर विमा कंपन्यांच्या चुकीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याची भूमिका सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.