शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

"माझ्या इतिहासावर बोलण्याआधी पवार साहेबांकडून..."; प्रफुल्ल पटेलांचे राऊतांना एका वाक्यात प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:54 IST

Praful Patel on Sanjay Raut: लोकसभेनंतर राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. गुरुवारी राज्यसभेत या विधेयकावर प्रदीर्घ चर्चा ...

Praful Patel on Sanjay Raut: लोकसभेनंतर राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. गुरुवारी राज्यसभेत या विधेयकावर प्रदीर्घ चर्चा झाली. चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोमणा मारला. संजय राऊतांनी रंग बदलू नये असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. प्रफुल्ल पटेल यांच्या भाषणावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रहार केला. तुम्हाला दाऊद इब्राहीमचा हिरवा रंग लागला आहे अशी टीका राऊतांनी केली. इतिहास काढला तर प्रफुल्ल पटेलांना महाराष्ट्र सोडून जायला लागेल असंही संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या टीकेला प्रफुल्ल पटेल यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिलं आहे.

वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊत यांच्यात राज्यसभेत जुगलबंदी रंगली होती. शिवसेनेने भूमिका बदलली हे सांगताना प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकरांशी बोलताना पटेलांवर निशाणा साधला. दाऊदच्या हस्तकांशी संबंध असल्याचे आरोप प्रफुल्ल पटेलांवर झाले आहेत. प्रफुल्ल पटेल दाऊदच्या संबंधासह भाजपसोबत गेले आहेत. आता ते इतरांना निष्ठेच्या गोष्टी सांगणार का अशी टीका संजय राऊत यांनी केली. त्यांचा इतिहास काढायला लागलो सर्व तर त्यांना महाराष्ट्र सोडून जावं लागेल, असंही संजय राऊत म्हणाले.

त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनी एक्स पोस्टवरुन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. "माझ्या चारित्र्यावर आणि इतिहासावर बोलण्याआधी आपण पवार साहेबांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं," असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत?

"आम्ही कसले रंग बदलले. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहोत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहोत. तुमचे रंग आधी पाहा. तुमचा रंग कोणता आहे. तुम्हाला दाऊद इब्राहीमचा हिरवा रंग लागला आहे. आणि तुम्ही वक्फवर बोलतात. मी प्रफुल्ल पटेलांना सांगतो माझ्या नादाला लागू नका. तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते. अशा घाण दळभद्र्याच्या तोंडाला लागणं हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे. त्यांचा इतिहास काढायला लागलो सर्व तर त्यांना महाराष्ट्र सोडून जावं लागेल. ही लोकं फडणवीस यांच्या बाजूला जाऊन बसणार. हे लोक महाराष्ट्राचं नेतृत्व संसदेत करतात. भाजपही या लोकांना खांद्यावर घेऊन बसतात," असं संजय राऊत यांनी म्हटलं.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डPraful Patelप्रफुल्ल पटेलSanjay Rautसंजय राऊतRajya Sabhaराज्यसभा