शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वडेट्टिवारांचे ‘ते’ वक्तव्य भाजपच्या हिताचे, विधान परिषदेत नक्कीच फायदा होणार : कपिल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 19:28 IST

राज्यसभा निवडणुकीत जी काही मत भाजपच्या पारड्यात पडली ती महाविकास आघाडी सरकारमधील नाराज आमदारांची होती, कपिल पाटील यांचं वक्तव्य

कल्याण: राज्यसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीतील मंत्री विजय वडेट्टिवार यांनी अपक्ष आमदारांना निधी देताना विचार करू हे केलेले वक्तव्य भाजपच्या हिताचे असून याचा फायदा विधानपरिषदेच्या निवडणूकीत होईल असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.

येथील निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन तर्फे रविवारी पाटील यांचा वार्तालाप होता. स्थानिक मुद्यांवर बोलताना पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीसंदर्भात वडेट्टीवारांसह संजय राऊत यांनीही केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले. वडेट्टिवार यांच्या वक्तव्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, “राज्यसभा निवडणुकीत जी काही मत भाजपच्या पारड्यात पडली ती महाविकास आघाडी सरकारमधील नाराज आमदारांची होती. निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांच्या निधीबाबत भाष्य करून वडेट्टिवारांनी एकप्रकारे येऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपला पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे.” “अपक्ष आमदार त्यांच्या वक्तव्याचा विचार करतील आणि भाजपला मतदान करतील याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील २२ विरोधी पक्ष नेत्यांना पत्र पाठवून बैठकीसाठी बोलावले आहे. त्यावर बोलताना पाटील यांनी भाजपचा उमेदवार १०० टक्के निवडून येणार असा दावा केला.

ईडीचा संबंध आला कुठून?“राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचा झालेला विजय हा देवेंद्र फडणवीसांच्या रणनितीचा आहे. संजय राऊत यांना रणनिती आणि निवडणूक लढविण्याचा अनुभव आहे की नाही याचा विचार करण्याची गरज आहे. काही झालं तरी ते केंद्राकडे बोट दाखवितात आणि ईडीशी संबंध जोडतात. राज्यसभेच्या निवडणुकीत ईडीचा संबंध आला कुठून, त्यांच्या दोन आमदारांना हायकोर्टानेही मतदानाचा हक्क नाकारला. हायकोर्टसुध्दा ईडीच्या सांगण्यावरून चालते का?,” असा सवाल पाटील यांनी केला.

दिबांच्या नावासाठी दबाव वाढविणारनवी दिल्ली येथे अखिल भारतीय लवणकार (आगरी) समाजाचे राष्ट्रीय संमेलन सोमवारी होणार आहे. यात नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला आगरी समाजातील दिवंगत नेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबत जो आग्रह समाजाकडून धरला जात आहे, त्यावर चर्चा करून दिबांचे नाव देण्यासाठी महाराष्ट्र सरकारवर दबाव वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMaharashtraमहाराष्ट्र