शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

वडेट्टिवारांचे ‘ते’ वक्तव्य भाजपच्या हिताचे, विधान परिषदेत नक्कीच फायदा होणार : कपिल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 19:28 IST

राज्यसभा निवडणुकीत जी काही मत भाजपच्या पारड्यात पडली ती महाविकास आघाडी सरकारमधील नाराज आमदारांची होती, कपिल पाटील यांचं वक्तव्य

कल्याण: राज्यसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीतील मंत्री विजय वडेट्टिवार यांनी अपक्ष आमदारांना निधी देताना विचार करू हे केलेले वक्तव्य भाजपच्या हिताचे असून याचा फायदा विधानपरिषदेच्या निवडणूकीत होईल असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.

येथील निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन तर्फे रविवारी पाटील यांचा वार्तालाप होता. स्थानिक मुद्यांवर बोलताना पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीसंदर्भात वडेट्टीवारांसह संजय राऊत यांनीही केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले. वडेट्टिवार यांच्या वक्तव्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, “राज्यसभा निवडणुकीत जी काही मत भाजपच्या पारड्यात पडली ती महाविकास आघाडी सरकारमधील नाराज आमदारांची होती. निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांच्या निधीबाबत भाष्य करून वडेट्टिवारांनी एकप्रकारे येऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपला पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे.” “अपक्ष आमदार त्यांच्या वक्तव्याचा विचार करतील आणि भाजपला मतदान करतील याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील २२ विरोधी पक्ष नेत्यांना पत्र पाठवून बैठकीसाठी बोलावले आहे. त्यावर बोलताना पाटील यांनी भाजपचा उमेदवार १०० टक्के निवडून येणार असा दावा केला.

ईडीचा संबंध आला कुठून?“राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचा झालेला विजय हा देवेंद्र फडणवीसांच्या रणनितीचा आहे. संजय राऊत यांना रणनिती आणि निवडणूक लढविण्याचा अनुभव आहे की नाही याचा विचार करण्याची गरज आहे. काही झालं तरी ते केंद्राकडे बोट दाखवितात आणि ईडीशी संबंध जोडतात. राज्यसभेच्या निवडणुकीत ईडीचा संबंध आला कुठून, त्यांच्या दोन आमदारांना हायकोर्टानेही मतदानाचा हक्क नाकारला. हायकोर्टसुध्दा ईडीच्या सांगण्यावरून चालते का?,” असा सवाल पाटील यांनी केला.

दिबांच्या नावासाठी दबाव वाढविणारनवी दिल्ली येथे अखिल भारतीय लवणकार (आगरी) समाजाचे राष्ट्रीय संमेलन सोमवारी होणार आहे. यात नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला आगरी समाजातील दिवंगत नेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबत जो आग्रह समाजाकडून धरला जात आहे, त्यावर चर्चा करून दिबांचे नाव देण्यासाठी महाराष्ट्र सरकारवर दबाव वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMaharashtraमहाराष्ट्र