शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वडेट्टिवारांचे ‘ते’ वक्तव्य भाजपच्या हिताचे, विधान परिषदेत नक्कीच फायदा होणार : कपिल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 19:28 IST

राज्यसभा निवडणुकीत जी काही मत भाजपच्या पारड्यात पडली ती महाविकास आघाडी सरकारमधील नाराज आमदारांची होती, कपिल पाटील यांचं वक्तव्य

कल्याण: राज्यसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीतील मंत्री विजय वडेट्टिवार यांनी अपक्ष आमदारांना निधी देताना विचार करू हे केलेले वक्तव्य भाजपच्या हिताचे असून याचा फायदा विधानपरिषदेच्या निवडणूकीत होईल असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.

येथील निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन तर्फे रविवारी पाटील यांचा वार्तालाप होता. स्थानिक मुद्यांवर बोलताना पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीसंदर्भात वडेट्टीवारांसह संजय राऊत यांनीही केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले. वडेट्टिवार यांच्या वक्तव्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, “राज्यसभा निवडणुकीत जी काही मत भाजपच्या पारड्यात पडली ती महाविकास आघाडी सरकारमधील नाराज आमदारांची होती. निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांच्या निधीबाबत भाष्य करून वडेट्टिवारांनी एकप्रकारे येऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपला पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे.” “अपक्ष आमदार त्यांच्या वक्तव्याचा विचार करतील आणि भाजपला मतदान करतील याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील २२ विरोधी पक्ष नेत्यांना पत्र पाठवून बैठकीसाठी बोलावले आहे. त्यावर बोलताना पाटील यांनी भाजपचा उमेदवार १०० टक्के निवडून येणार असा दावा केला.

ईडीचा संबंध आला कुठून?“राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचा झालेला विजय हा देवेंद्र फडणवीसांच्या रणनितीचा आहे. संजय राऊत यांना रणनिती आणि निवडणूक लढविण्याचा अनुभव आहे की नाही याचा विचार करण्याची गरज आहे. काही झालं तरी ते केंद्राकडे बोट दाखवितात आणि ईडीशी संबंध जोडतात. राज्यसभेच्या निवडणुकीत ईडीचा संबंध आला कुठून, त्यांच्या दोन आमदारांना हायकोर्टानेही मतदानाचा हक्क नाकारला. हायकोर्टसुध्दा ईडीच्या सांगण्यावरून चालते का?,” असा सवाल पाटील यांनी केला.

दिबांच्या नावासाठी दबाव वाढविणारनवी दिल्ली येथे अखिल भारतीय लवणकार (आगरी) समाजाचे राष्ट्रीय संमेलन सोमवारी होणार आहे. यात नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला आगरी समाजातील दिवंगत नेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबत जो आग्रह समाजाकडून धरला जात आहे, त्यावर चर्चा करून दिबांचे नाव देण्यासाठी महाराष्ट्र सरकारवर दबाव वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMaharashtraमहाराष्ट्र