शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

महाराष्ट्रात महामार्गांपेक्षा शहरी, ग्रामीण रस्त्यांवर सर्वाधिक अपघात¨ बळी जाणा-यांचे प्रमाणही चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 19:31 IST

महाराष्ट्रात जानेवारी २0१६ ते एप्रिल २0१९ या कालावधित एकूण ३९ हजार ४९५ अपघातात ५२ हजार ५६५ लोकांना जीव गमवावा लागला. यात पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण ७५ टक्के, तर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. दरवर्षी राज्यात होणा-या अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे.

ठळक मुद्दे मात्र ज्याठिकाणी वेगाची मर्यादा घातली आहे, अशा स्थानिक मार्गांवरील अपघातांचे व त्यात बळी जाणा-यांचे प्रमाणही चिंताजनक आहे.आॅनलाईन विशेष न्यूज

अविनाश कोळी

सांगली : एक्स्प्रेस वे, राष्ट्रीय व राज्य महामार्गांपेक्षा जिल्हा व ग्रामीण मार्गांवरील अपघातांचे व त्यातील मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.महाराष्ट् राज्य महामार्ग पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, दरवर्षी महाराष्ट्रातील जिल्हा व अन्य मार्गांवरील अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या ५ हजारावर आहे. त्यामुळे महामार्गांपेक्षा अन्य मार्ग अधिक धोकादायक बनल्याचे दिसून येते.

महाराष्ट्रातील रस्तेनिहाय अपघातांच्या २0१६ ते २0१८ या तीन वर्षातील आकडेवारीचा अभ्यास केला, तर एक्स्प्रेस वेवरील अपघातात सरासरी ९५, राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात ३ हजार ३00, तर राज्य महामार्गावरील अपघातात ३ हजार २00 लोकांचा बळी जात आहे. तुलनेत अन्य मार्गांवर म्हणजेच जिल्हा, शहरी व ग्रामीण मार्गांवरील अपघातात बळी जाणाऱ्यांचे सरासरी वार्षिक प्रमाण ५ हजार ३00 च्या आसपास आहे. महामार्गांवरील वाहनांची गती अधिक असते, म्हणून याठिकाणीच अधिक अपघात होत असतात, असे सर्रास म्हटले जाते. मात्र ज्याठिकाणी वेगाची मर्यादा घातली आहे, अशा स्थानिक मार्गांवरील अपघातांचे व त्यात बळी जाणा-यांचे प्रमाणही चिंताजनक आहे.

महाराष्ट्रात जानेवारी २0१६ ते एप्रिल २0१९ या कालावधित एकूण ३९ हजार ४९५ अपघातात ५२ हजार ५६५ लोकांना जीव गमवावा लागला. यात पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण ७५ टक्के, तर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. दरवर्षी राज्यात होणा-या अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. गंभीररित्या जखमी व किरकोळ दुखापत झालेल्या अपघातग्रस्तांची संख्या पाहिल्यानंतरही, त्यात जिल्हा, शहरी व ग्रामीण भागातील अपघातांचा प्रथम क्रमांक लागतो. राष्ट्रीय व राज्य महामार्गांपेक्षा अन्य मार्गांवरील जखमींची संख्या जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे अन्य मार्ग सर्वाधिक धोकादायक बनले आहेत.

  • रस्तेनिहाय राज्यातील अपघातांचे प्रमाण...
  • वर्ष मार्ग प्रकार अपघात मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी
  • २0१६ एक्स्प्रेस वे २८१ १५१ १५३ २६
  • राष्ट्रीय महामार्ग १0,0८३ ३७३६ ५६६६ ३६७0
  • राज्य महामार्ग ९0५२ ३६३६ ५३८१ २८२६
  • अन्य मार्ग २0,४६२ ५४१२ ११0७३ ७0८९
  • वर्ष मार्ग प्रकार अपघात मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी
  • २0१७ एक्स्प्रेस वे ३६0 १0५ १४७ ४४
  • राष्ट्रीय महामार्ग ८८७७ ३५३२ ५३0५ २८५५
  • राज्य महामार्ग ८५0८ ३६२२ ५१९८ २५७६
  • अन्य मार्ग १८१0८ ५00५ ९८१५ ६१८८
  • वर्ष मार्ग प्रकार अपघात मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी
  • २0१८ एक्स्प्रेस वे ३५९ ११४ १७४ ३१
  • राष्ट्रीय महामार्ग ८९९६ ३९७४ ५३१३ २९३९
  • राज्य महामार्ग ७७५५ ३४४६ ४६१५ २४१३
  • अन्य मार्ग १८६0७ ५७२७ १0२३३ ५६४७
  • २०१९ ची आकडेवारीही अधिक

 

जानेवारी ते एप्रिल २०१९ या चार महिन्यांच्या कालावधित ११ हजार ८७० अपघातांची नोंद झाली असून, त्यात बळी जाणा-यांची संख्या ४५२० इतकी आहे. या आकडेवारीतही महामार्गांपेक्षा अन्य मार्गांवरील मृत्यू व गंभीररित्या जखमी होणा-यांचे प्रमाण अधिक आहे. चार महिन्यांची ही आकडेवारी मागील तीन वर्षांच्या सरासरीइतकीच आहे.कारणांचा शोध घ्यायला हवा 

महामार्गांवरील अपघातांबरोबरच अन्य मार्गांवरील अपघातांची संख्या का वाढत आहे, त्याची कारणे काय आहेत, याचा शोध घेणे गरजेचे आहे. कारणांचा शोध घेतल्याशिवाय उपाययोजनांचा आराखडा तयार करता येणार नाही. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना असल्या तरी, घटनांची कारणमीमांसा प्रथम होण्याची गरज आहे.

 

 

 

 

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गMaharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यू