शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

Monsoon: आभाळमाया बरसली, शेत-शिवारं भिजली, मान्सूनची जळगाव, अकोल्यापर्यंत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 09:05 IST

Monsoon Rain Update: मान्सूनने मंगळवारी (दि.११) राज्यातील जळगाव, अकोला, पुसदपर्यंत प्रगती केली आहे. उर्वरित राज्यात पोहोचण्यासाठी पोषक हवामान तयार झालेले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून आणखी काही भाग व्यापणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.  

 पुणे  - मान्सूनने मंगळवारी (दि.११) राज्यातील जळगाव, अकोला, पुसदपर्यंत प्रगती केली आहे. उर्वरित राज्यात पोहोचण्यासाठी पोषक हवामान तयार झालेले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून आणखी काही भाग व्यापणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.  

राज्यातील निम्मा भाग मान्सूनने व्यापला आहे. सध्या मान्सून जळगाव, धुळे, बुलडाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे. तसेच संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापलेला आहे. मंगळवारी गुजरातमध्येही मान्सूनने प्रवेश केला. दोन दिवसांमध्ये मान्सून तेलंगणा आणि छत्तीसगडच्या आणखी काही भागांमध्ये मजल मारेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

आज इशारा कुठे? बुधवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये बहुतांश ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागांमध्ये ‘येलो अलर्ट’ आहे. पुढील ४८ तासांमध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, बीड, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव, अहमदनगर, सोलापूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला.

परभणीमध्ये सर्वदूर; २३ मिलिमीटरची नोंद  परभणी जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरापर्यंत सर्वदूर पावसाने हजेरी लावली. यामध्ये पाथरी आणि परभणी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसाने शहरातील अनेक सखल भागातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते.

बीडमध्ये सर्वच तालुक्यांत जोरदार   बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सोमवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. चार मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. मंगळवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते. 

वीज पडून दोघांचा मृत्यूअकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. एका घटनेत ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत एक युवक शेतात मृत आढळून आला. त्याचाही मृत्यू वीज कोसळून झाल्याचा अहवाल आहे. पहिल्या घटनेत, मूर्तिजापूर तालुक्यातील टिपटाळा येथील शालीग्राम श्रीराम डोंगरे (६५) हे त्यांच्या शेतात झाडाखाली थांबले असताना सायंकाळी वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ब्रह्मी खुर्द येथील तलाठी यांनी अहवाल दिला आहे. त्याचप्रमाणे, मौजे खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे (२६) हा  शेतात मृत अवस्थेत आढळून आला.

सर्जा-राजाला वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजाचा मृत्यूशेतात जात असताना रेल्वे बोगद्यात साचलेल्या पाण्यातून बैलांची सुटका करत असताना सुकलाल लालचंद माळी (६३, रा. आसोदा, ता. जळगाव) या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी आसोदा ते मन्यारखेडा (ता. जळगाव) रस्त्यावर घडली. सोमवारी रात्री म्हसावद, रिंगणगाव, वाकडी व नांद्रा या चार महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. 

जालना जिल्ह्यातील दहा मंडळांत झाली अतिवृष्टीजालना जिल्ह्याच्या विविध भागांत मंगळवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांत ४३.५० मिमी पाऊस झाला. त्यात जिल्ह्यातील १० महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात एका दिवसात सरासरी ४३.५० मिमी पाऊस झाला आहे.   

लातूर : ३४ मंडळांत अतिवृष्टीलातूर जिल्ह्यात सोमवारी रात्री ३४ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतशिवारात पाणी पाणी झाले आहे. यातील ७ महसूल मंडळांत १०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. 

धाराशिव : २४ तासांत शंभर मिमीपेक्षा जास्तधाराशिव जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत सात महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. तर जिल्ह्यात सरासरी ४५ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला.  

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र